शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:03 IST

नवी मुंबईसह पनवेलमध्ये विसर्जन; पोलिसांची चोख व्यवस्था

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गौरी-गणपतीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर पनवेल महापालिका क्षेत्रातील दुपारनंतर गौरी-गणपतीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गौरी-गणपती विसर्जनाला दुपारनंतर सुरुवात झाली. रिमझिम कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ७०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील २३ तलावांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दिवाळे कोळीवाडा, घणसोली, वाशी, कोपरखैरणे आणि दिघा तलावांवर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करीत उत्साहात; तितक्याच भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेच्या कामावर लक्ष ठेवून होते.

उरणमध्ये मोरा सागरी पोलीस, उरण पोलीस आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाणे आदी तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे साडेपाच हजार गौरी-गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी दुपारपासूनच सुरुवात झाली होती. फुले, तोरणांनी सजविण्यात आलेल्या विविध गाड्यातून वाजत-गाजत गौरी-गणपती विसर्जनासाठी निघाले होते. उरण परिसरातील घारापुरी, मोरा, न्हावा, गव्हाण हनुमान कोळीवाडा, करंजा, पीरवाडी, माणकेश्वर आदी समुद्राच्या खाडीत तर परिसरातील विविध गावांतील तलावात गौरी-गणपतीमूर्तींना भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उरण शहरातील विमला तलावात हजारो गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जात होते.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने उरण परिसरात शांततेत विसर्जन झाल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली. पनवेल शहरासह ग्रामीण भागात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

सहा दिवसांच्या गणपतीसह गौरीमूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांच्या गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यात घरगुती गणपती डोक्यावर घेऊन तर कित्येकांनी खासगी गाडीतून जयघोष करीत बाप्पाची मिरवणूक काढली.या मिरवणुकीत लहान मुलांसह, महिला, पुरु ष, प्रौढांनीही सहभाग घेतला होता. संपूर्ण पनवेल परिसरात श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

गुलालाची उधळण करत, तालुक्यातील गावांमध्ये गाढी नदीमध्ये गौराई व गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पालिका हद्दीत ठिकठिकाणच्या तलावात, कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, खिडूकपाडा स्टील मार्केट, खांदेश्वर शिव मंदिर आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019