शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:03 IST

नवी मुंबईसह पनवेलमध्ये विसर्जन; पोलिसांची चोख व्यवस्था

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गौरी-गणपतीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर पनवेल महापालिका क्षेत्रातील दुपारनंतर गौरी-गणपतीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गौरी-गणपती विसर्जनाला दुपारनंतर सुरुवात झाली. रिमझिम कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ७०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील २३ तलावांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दिवाळे कोळीवाडा, घणसोली, वाशी, कोपरखैरणे आणि दिघा तलावांवर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करीत उत्साहात; तितक्याच भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेच्या कामावर लक्ष ठेवून होते.

उरणमध्ये मोरा सागरी पोलीस, उरण पोलीस आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाणे आदी तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे साडेपाच हजार गौरी-गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी दुपारपासूनच सुरुवात झाली होती. फुले, तोरणांनी सजविण्यात आलेल्या विविध गाड्यातून वाजत-गाजत गौरी-गणपती विसर्जनासाठी निघाले होते. उरण परिसरातील घारापुरी, मोरा, न्हावा, गव्हाण हनुमान कोळीवाडा, करंजा, पीरवाडी, माणकेश्वर आदी समुद्राच्या खाडीत तर परिसरातील विविध गावांतील तलावात गौरी-गणपतीमूर्तींना भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उरण शहरातील विमला तलावात हजारो गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जात होते.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने उरण परिसरात शांततेत विसर्जन झाल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली. पनवेल शहरासह ग्रामीण भागात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

सहा दिवसांच्या गणपतीसह गौरीमूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांच्या गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यात घरगुती गणपती डोक्यावर घेऊन तर कित्येकांनी खासगी गाडीतून जयघोष करीत बाप्पाची मिरवणूक काढली.या मिरवणुकीत लहान मुलांसह, महिला, पुरु ष, प्रौढांनीही सहभाग घेतला होता. संपूर्ण पनवेल परिसरात श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

गुलालाची उधळण करत, तालुक्यातील गावांमध्ये गाढी नदीमध्ये गौराई व गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पालिका हद्दीत ठिकठिकाणच्या तलावात, कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, खिडूकपाडा स्टील मार्केट, खांदेश्वर शिव मंदिर आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019