शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महामार्गावरील भुयारी मार्ग गटारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:39 IST

डेब्रिज, कचरा, प्लॅस्टिकचा खच : जीव धोक्यात घालून ग्रामस्थ ओलांडताहेत रस्ता

कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावरील सबवेला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नावडे येथील सबवे पूर्णपणे बुजवण्यात आला आहे. त्यात कचरा तसेच सांडपाणी सोडले जात आहेत. भुयारी मार्ग बंद असल्याने गावकरी महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. याविषयी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

पनवेल -मुंब्रा महामार्ग क्रमांक ४ असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे. या मार्गावरून बाहेरच्या राज्यातून अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली येथील स्टील मार्केट, जेएनपीटी तसेच पुणे येथे जाणारी वाहने सुध्दा याच महामार्गाचा वापर करतात. दहा वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी महामार्गालगत असलेल्या नावडे, खुटारी, रोहिंजन या गावाकरिता जाण्या-येण्यासाठी सबवे तयार करण्यात आला. काही दिवस गावकऱ्यांनी या भुयारी मार्गाचा वापर केला. परंतु गेल्या चार वर्षांपासून मार्ग बंद पडल्याने महामार्ग ओलांडावा लागतो. यात मोठ्या प्रमाणात अपघात होतात तर कित्येक रहिवाशांचे बळी सुध्दा गेले आहेत.

रोहिंजन येथील भुयारी मार्गात गटाराचे स्वरूप आले आहे. आतमध्ये पाणी साचल्याने डास आणि दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांना या सबवेचा वापर न होता बॅनरबाजीसाठी उपयोग केला जातो. एमएसआरडीसीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भभवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेली दोन वर्षांपासून रस्ते विकास महामंडळाने याकडे दुर्लक्षित केले आहे. भुयारी मार्गाकरिता वारंवार तक्रारी करुन सुध्दा एमएसआरडीसीने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. या मार्गावर टोलवसुली केली जाते. तर मग सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

पाहणी झाली तरी उपाययोजना नाहीतच्एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी यांनी सहा महिन्याअगोदर पनवेल-मुंब्रा महामार्गाचा पाहणी दौरा केला. यात गावकऱ्यांना येणाºया अडचणी जाणून घेतल्या. याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी दिली. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. 

मुंब्रा महामार्गावरील असलेल्या भुयारी मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल. आतील पाणी काढून ते स्वच्छ केले जाईल. याबाबत लवकरच कामाला सुरुवात करून सबवे नागरिकांसाठी खुले केले जाईल.-नम्रता रेड्डी,कार्यकारी अभियंतामहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ