शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील भुयारी मार्ग गटारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:39 IST

डेब्रिज, कचरा, प्लॅस्टिकचा खच : जीव धोक्यात घालून ग्रामस्थ ओलांडताहेत रस्ता

कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावरील सबवेला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नावडे येथील सबवे पूर्णपणे बुजवण्यात आला आहे. त्यात कचरा तसेच सांडपाणी सोडले जात आहेत. भुयारी मार्ग बंद असल्याने गावकरी महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. याविषयी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

पनवेल -मुंब्रा महामार्ग क्रमांक ४ असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे. या मार्गावरून बाहेरच्या राज्यातून अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली येथील स्टील मार्केट, जेएनपीटी तसेच पुणे येथे जाणारी वाहने सुध्दा याच महामार्गाचा वापर करतात. दहा वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी महामार्गालगत असलेल्या नावडे, खुटारी, रोहिंजन या गावाकरिता जाण्या-येण्यासाठी सबवे तयार करण्यात आला. काही दिवस गावकऱ्यांनी या भुयारी मार्गाचा वापर केला. परंतु गेल्या चार वर्षांपासून मार्ग बंद पडल्याने महामार्ग ओलांडावा लागतो. यात मोठ्या प्रमाणात अपघात होतात तर कित्येक रहिवाशांचे बळी सुध्दा गेले आहेत.

रोहिंजन येथील भुयारी मार्गात गटाराचे स्वरूप आले आहे. आतमध्ये पाणी साचल्याने डास आणि दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांना या सबवेचा वापर न होता बॅनरबाजीसाठी उपयोग केला जातो. एमएसआरडीसीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भभवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेली दोन वर्षांपासून रस्ते विकास महामंडळाने याकडे दुर्लक्षित केले आहे. भुयारी मार्गाकरिता वारंवार तक्रारी करुन सुध्दा एमएसआरडीसीने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. या मार्गावर टोलवसुली केली जाते. तर मग सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

पाहणी झाली तरी उपाययोजना नाहीतच्एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी यांनी सहा महिन्याअगोदर पनवेल-मुंब्रा महामार्गाचा पाहणी दौरा केला. यात गावकऱ्यांना येणाºया अडचणी जाणून घेतल्या. याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी दिली. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. 

मुंब्रा महामार्गावरील असलेल्या भुयारी मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल. आतील पाणी काढून ते स्वच्छ केले जाईल. याबाबत लवकरच कामाला सुरुवात करून सबवे नागरिकांसाठी खुले केले जाईल.-नम्रता रेड्डी,कार्यकारी अभियंतामहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ