शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

रक्तचंदन तस्करीत वाढ

By admin | Updated: July 11, 2015 03:38 IST

गेल्या काही वर्षात उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत

मधुकर ठाकूर, उरणगेल्या काही वर्षात उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे बंदर संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडले आहे. कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत विविध ठिकाणी आणि काही कंटेनर गोदामांवर धाडी टाकून ६५६.५७७ मे. टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत अब्जावधी रुपये आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप तरी सुरक्षा यंत्रणेचे हात पोहोचलेले नाहीत. परिणामी मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याने रक्तचंदनाची जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहेत.जेएनपीटी बंदरातून याआधी शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापाची कातडी मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. चार-पाच वर्षांपासून आता तस्करीमध्ये रक्तचंदनाची भर पडली आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. लाकडी कलाकुसरीची घरे, घरातील सुबक फर्निचर आणि इतर तत्सम कामांसाठी रक्तचंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रक्तचंदनाच्या लाकडामुळे घरातील वातावरण सातत्याने थंड राहते. तसेच लाकडापासून सुबक आणि टिकाऊ फर्निचर तयार होत असल्याने या रक्तचंदनाच्या लाकडाला परदेशात मोठी मागणी आहे. भारतात कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातील जंगलात रक्तचंदनाची लागवड केली जाते. फारच महागडे असल्याचे भारतात रक्तचंदनाच्या लाकडाचा उपयोग गर्भश्रीमंत करतात. देशात या दुर्मीळ रक्तचंदनाच्या एका किलोची किंमत साधारणत: तीन ते चार हजार रुपयापर्यंत आकारली जाते, तर परदेशात रक्तचंदन १५० डॉलर प्रतिकिलोच्या भावाने विकले जाते. परदेशात रक्तचंदनाच्या लाकडाला मिळणाऱ्या प्रचंड भावामुळे आंतरराष्ट्रीय संघटित माफियांनी रक्तचंदनाच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे रक्तचंदनाच्या तस्करीसाठी आता जेएनपीटी बंदराचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे मागील आठ वर्षांतील अनेक घटनांमुळे उघडकीस येऊ लागले असून मूळ आरोपी पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.