शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान विभागाची झाडाझडती

By admin | Updated: June 22, 2017 00:29 IST

उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही. वृक्ष सुकत आहेत. खेळण्यांची व बैठक व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. देखभालीची सक्षम यंत्रणाच नाही. उद्यानांमध्ये लाल माती, खत पुरविण्याच्या कामांचीही चौकशी करण्यात गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केली आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये शहरातील उद्यानांची देखभाल व दुरूस्ती नवीन उद्यानांची निर्मिती करण्यासाठी केलेल्या खर्चाचे विवरण माहितीसाठी सादर करण्यात आले हाते. ३७ ठिकाणी केलेल्या कामांवर ४ कोटी ३१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. या विषयांच्या अनुषंगाने नगरसेवकांनी शहरातील उद्यानांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित केले. माजी उपमहापौर अंकुश गावडे यांनी उद्यानांचे संवर्धन म्हणजे नक्की काय असा प्रश्न उपस्थित केला. शहरामध्ये अनेक ठिकाणी दुकानांसमोरील वृक्ष सुकले आहेत. काही ठिकाणी पेट्रोल व इतर इंधन टाकून वृक्ष सुकविण्यात आले आहेत. हे वृक्ष नक्की कशामुळे सुकले याची चौकशी झाली पाहिजे. अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये वृक्ष सुकले आहेत. खेळण्यांची दुरवस्था झालेली आहे. बैठक व्यवस्थेसाठीचे बाकडे तुटले आहेत. देखभाल करणारा ठेकेदार त्यांची जबाबदारी फक्त वृक्ष संवर्धनाची असल्याचे सांगत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनीही उद्यान विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्यानामध्ये किती माती टाकली, शेणखत किती टाकले याची चौकशी केली पाहिजे. उद्यानांमध्ये होणाऱ्या कामांची देखभाल होत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही देखभाल दुरूस्तीचे सर्वसमावेशक कंत्राट काढताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे मत व्यक्त केले. सीबीडीमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी उद्यान विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु प्रत्यक्षात होणारी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी योग्य यंत्रणा नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी यंत्रसामग्री नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सानपाडा परिसरामध्ये उद्याने भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये अत्यावश्यक कामे करण्यासाठी विनंती केल्यानंतरही प्रशासन लक्ष देत नसल्याची नाराजीही व्यक्त केली. घणसोली व नेरूळ पूर्व परिसरात उद्याने निर्माण करण्याची मागणी प्रशांत पाटील व मीरा पाटील यांनी केली. उपआयुक्त तुषार पवार व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सदस्यांनी सुचविलेल्या मुद्यांचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.