शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शहरातील रेल्वे स्थानके बनली कचऱ्याचे आगार

By admin | Updated: April 18, 2017 03:13 IST

सिडकोने नवी मुंबई परिसरात अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली आली आहेत. मात्र याच रेल्वे स्थानकांमध्ये कचरा न उचलल्या गेल्याने स्थानकांचे विद्रूपीकरण झाले आहे

नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई परिसरात अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली आली आहेत. मात्र याच रेल्वे स्थानकांमध्ये कचरा न उचलल्या गेल्याने स्थानकांचे विद्रूपीकरण झाले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांनी बुधवारपासून पुकारलेल्या बंदमुळे रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सफाई कामगारांच्या या संपाचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहेत.सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना कचऱ्यातून मार्ग काढावा लागत आहे तर गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नाकाला रुमाल लावून लोकलचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये कचऱ्याचा ढीग साचला आहे. सहा दिवसांपासून कचरा न उचलल्याने कचराकुंड्यांबाहेरही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तिकीट घर, फलाटांकडे जाणारा मार्ग आदी परिसरात जागोजागी कचरा साचला आहे. अस्वच्छतेमुळे माश्यांचे प्रमाण वाढले असून रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशी, बेलापूर रेल्वे स्थानकांच्या इमारतीमध्ये इन्फोटेक पार्क उभारण्यात आले असून याठिकाणी सिडकोच्या वतीने स्वच्छतेसाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. मात्र सफाई कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जाव्यात याकरिता पुकारण्यात आलेल्या बंदमुळे या संपूर्ण परिसराची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. अनेक रेल्वे स्थानक परिसरात खाद्यपदार्थांचे गाळे असून या दुर्गंधीयुक्त परिसरातील अन्नपदार्थ चाखणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे होय. कचऱ्यामुळे स्थानक परिसरात उंदीर, कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी तसेच अस्वच्छतेमुळे प्रवाशांना लोकल प्रवास करणे त्रासदायक ठरणार आहे. स्थानकातील कचराकुंड्यांचीही दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)