शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

गारमाळ आदिवासीवाडी पाणीटंचाईने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:53 IST

तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

पनवेल : तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गारमाळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांची सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील मोरबे परिसरात गारमाळ आदिवासी वाडी वसलेली आहे. जवळपास या वाडीत ४० घरे असून २०० आदिवासी बांधव राहत आहेत. पाण्यासाठी येथील आदिवासींना विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने विहिरीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने आदिवासी समाजाला सेवा सुविधा देण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी देखील योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे गरजेचे झाले आहे.वीज, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून काही आदिवासी समाज आजही वंचित राहिला आहे. पाण्यासाठी आदिवासींना वणवण फिरावे लागते. डोक्यावर हंडे घेऊन आदिवासी समाजाला पाण्यासाठी मैलभर चालत जावे लागते. वर खाली, वळणे असलेल्या रस्त्यात पडल्यामुळे गंभीर दुखापत होण्याची भीती असताना देखील आदिवासी समाज सुविधांच्या प्रतीक्षेत आहे.>मोरबे धरणाच्या वरील भागात असलेल्या गारमाळ आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कमी होत चालले आहे. उन्हाळ्याला नुकतीच सुरु वात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत चालले आहे. त्यामुळे गारमाळ आदिवासी वाडीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.