शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

माथाडी कामगार रमलेत गणेशभक्तीत

By admin | Updated: September 21, 2015 03:10 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात. गणेश उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. साध्यापद्धतीने उत्सव साजरा करताना प्रबोधनाचा वारसाही जपला जात आहे. दिवसभर गोणी उचलण्याचे काम करणारे माथाडी कामगार बाजारपेठा मुंबईत असल्यापासून गणेश उत्सवाचे आयोजन करत आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील अण्णासाहेबत पाटील सांस्कृतीक सेवा मंडळाच्यावतीने ३६ वर्षापासून उत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी राज्यभर दुष्काळ असल्यामुळे कामगारांनी देखाव्यांवर खर्च केला नाही. गणरायासमोर रोज भजनाचे आयोजन केले जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाणी बचत व दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. दैनंदिन काम करून माथाडी कामगार गणरायाची सेवा करत आहेत. कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, अध्यक्ष पोपट पवार, सचीव गुंगा पाटील, शामराव जाधव, विठ्ठल धनावडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. व्यापारी, मेहता, वाहतूकदार सर्वच उत्सवामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. मसाला मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णासाहेब पाटील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माथाडी हॉस्पीटलमधील रूग्णांना मदत, महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ, नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठीचे उपक्रम राबविले जात आहेत. अध्यक्ष सखाराम शेलार, उपाध्यक्ष संतोष अहिरे, नामदेव चिकणे, संतोष धोंडे व इतर पदाधिकारी गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धान्य मार्केटमध्ये गणेश उत्सव मंडळाने माथाडी रूग्णालयास एक लाख रूपये दिले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मदत व दुष्काळग्रस्तांनाही मदत करण्याचे निश्चीत केले आहे.