शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

सहा लाख लोकांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: April 19, 2017 00:59 IST

सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सिडको वसाहतीतील रस्त्यांची अवस्था उकिरड्यासारखी झाली होती

वैभव गायकर, पनवेलसफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सिडको वसाहतीतील रस्त्यांची अवस्था उकिरड्यासारखी झाली होती. सफाई कामगारांची ठाम भूमिका आणि सिडकोच्या आडमुठ्या धोरणांमुळे गेल्या सहा दिवसांपासून सामान्य नागरिक कचऱ्यामुळे चांगलाच भरडला गेला. अखेर सातव्या दिवशी कोकण श्रमिक संघटनेबरोबर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी बैठक घेतली आणि मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यावर कामगार नेत्यांनी आंदोलनास स्थगिती दिली. मात्र या आंदोलनाने सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून सिडको - कामगारांच्या लढाईत सर्वसामान्यांचा बळी का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी सिडकोने आपली जबाबदारी म्हणून सफाई कामगारांना विश्वासात घेतले असते तर गेल्या सहा दिवसांपासून सिडकोच्या विविध नोडमध्ये कचऱ्यामुळे जो गोंधळ उडाला आहे, रोगराई, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तो झाला नसता. मंगळवारी संप मिटल्यावर दुपारनंतर कचरा उचलण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्येक नोड, सोसायटी, रेल्वे स्थानक आदी सिडको वसाहतीत साचलेला हजारो टन कचरा उचलण्यास सिडकोला दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. सिडको नोडमध्ये ३३ सफाई कंत्राटदारांमार्फत शहरात विविध ठिकाणी सफाईची कामे केली जातात. रस्ते, वसाहती, सिडको कार्यालय, स्मशानभूमी, मलेरिया औषध फवारणी, सिडको कँटीन आदी ठिकाणी काम करणारे १३०० कामगार कोकण श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली १२ एप्रिलपासून संपावर गेले होते. ठेकेदारांनी कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका घेत सिडकोने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. कचरा प्रश्न अधिक चिघळल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. तब्बल सहा दिवसांपासून खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, वडघर, तळोजा आदी ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे मोठे ढीगच्या ढीग पडले होते. दुर्गंधीमुळे त्रस्त झाल्याने काही ठिकाणी अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी कचऱ्याला आग लावण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेल्या धुराचाही नागरिकांना त्रास झाला. सिडको स्थापनेपासून आजवरचे हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, कामगारांच्या बदलीचे देखील अधिकार आम्हाला नाहीत, त्यामुळे त्यांना काढण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत कामगार कामावर येत नाहीत तोपर्यंत काहीच करू शकत नाही. नाका कामगारांमार्फत कचरा उचलायला सुरु वात केली तर त्यांना संरक्षण कोण देणार? सिडकोकडून कामगारधार्जिणे धोरण राबवण्यात येत असल्याची प्रतिक्रि या सफाई कंत्राटदार संदीप पाटील यांनी दिली. शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवली होती. नवीन पनवेल माथेरान रोड, तसेच आदई सर्कलवरून, खांदा वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर इतका कचरा साचला होता की एक लेन बंदच करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी सिडकोकडून मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्यानंतर सफाई कामगारांनी आंदोलन स्थगित केले. मात्र तोपर्यंत शहरात तब्बल अडीच हजार टनाच्या आसपास कचरा सिडकोच्या विविध नोडमध्ये साचला होता.सफाई कामगारांच्या आंदोलनाने पनवेल महापालिका क्षेत्रातही समस्या उद्भवली. यासंदर्भात पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना विचारणा केली असता, या सर्व गोष्टी सिडकोच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे पालिका काहीही करू शकत नाही. सफाई कामगारांच्या संदर्भात सिडकोने कंत्राटदारांशी करार केला असल्याने त्यांनीच योग्य मार्ग काढावा, असे सुचवले.सहा दिवसांपासून उद्भवलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले होते. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री याठिकाणी फिरकलेच नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त आहे.