शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:16 IST

वाशीमधील अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी शिवाजी चौकात उपोषण केले.

नवी मुंबई : वाशीमधील अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी शिवाजी चौकात उपोषण केले. वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जावू नये अशी मागणी केली. कोणत्याही स्थितीमध्ये घरे खाली करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.नवी मुंबईमधील ४४३ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील ५५ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून त्या त्वरित रिकाम्या करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. वाशीमधील गुलमोहर व इतर इमारतीमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला होता. महापालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी मंगळवारी वाशीतील शिवाजी चौकात उपोषण केले. अतिधोकादायक घोषित करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इमारती खाली करून जायचे कुठे असा प्रश्नही रहिवाशांनी उपस्थित केला आहे. महापालिकेकडे संक्रमण शिबिर व इतर काहीही सुविधा उपलब्ध नाही. कोणत्याही स्थितीमध्ये इमारती खाली करणार नाही. प्रशासनाने सक्ती केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. वाशीतील आंदोलनाला नवी मुंबई नागरिक कृती समितीनेही पाठिंबा दिला आहे. कृती समिती या लढ्यात पूर्णपणे सहकार्य केले जाईल. नागरिकांवरील अन्याय कोणत्याही स्थितीमध्ये सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे. यावेळी काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, सूरज देसाई व इतर नागरिक उपस्थित होते.>महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या घरांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करू नये. कोणत्याही स्थितीमध्ये रहिवाशांवरील अन्याय सहन केला जाणार नसून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.- दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते महापालिका>धोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाला इशारा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने मनमानी सुरू ठेवली किंवा रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.- चंद्रकांत हरियान, रहिवासी, गुलमोहर सोसायटी