शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत

By admin | Updated: April 6, 2016 04:25 IST

आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील

नवी मुंबई : आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी करावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जीव मुठीत घेवून रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. यात अंत्ययात्रेतील शोकाकुल ग्रामस्थांची परवड तर होतेच, अनेकदा मृतदेहाचीही विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आग्रोळी गावातील ग्रामस्थांना मागील अनेक वर्षांपासून या समस्येने ग्रासले आहे. गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. बेलापूर येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. अनेकदा लोकलचा अंदाज येत नसल्याने अंत्ययात्रेची तारांबळ उडते. रेल्वे रुळाच्या खाली उतरताना तर मृतदेहाची अक्षरश: विटंबना होते. आता तर या या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या त्रासात आणखी वाढ झाली आहे. या त्रासातून सुटका करण्यासाठी आग्रोळी गावात स्वतंत्र स्मशानभूमी बांधावी, अशी येथील ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. त्यानुसार २0११ मध्ये महापालिकेने आग्रोळी गावात नवीन स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मे. अजय कन्स्ट्रक्शन या कंपनीला स्मशानभूमी बांधण्याचे काम देण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव जैसे थे अवस्थेत पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.सध्या बेलापूर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे लाइनच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. अशा स्थितीत गावात कोणाचे मयत झाले तर त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत कशी न्यायची, असा सवाल ग्रामस्थांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस सुधीर पाटील यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांना एक लेखी निवेदन देवून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशीही त्यांनी यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)