शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत

By admin | Updated: April 6, 2016 04:25 IST

आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील

नवी मुंबई : आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी करावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जीव मुठीत घेवून रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. यात अंत्ययात्रेतील शोकाकुल ग्रामस्थांची परवड तर होतेच, अनेकदा मृतदेहाचीही विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आग्रोळी गावातील ग्रामस्थांना मागील अनेक वर्षांपासून या समस्येने ग्रासले आहे. गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. बेलापूर येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. अनेकदा लोकलचा अंदाज येत नसल्याने अंत्ययात्रेची तारांबळ उडते. रेल्वे रुळाच्या खाली उतरताना तर मृतदेहाची अक्षरश: विटंबना होते. आता तर या या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या त्रासात आणखी वाढ झाली आहे. या त्रासातून सुटका करण्यासाठी आग्रोळी गावात स्वतंत्र स्मशानभूमी बांधावी, अशी येथील ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. त्यानुसार २0११ मध्ये महापालिकेने आग्रोळी गावात नवीन स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मे. अजय कन्स्ट्रक्शन या कंपनीला स्मशानभूमी बांधण्याचे काम देण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव जैसे थे अवस्थेत पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.सध्या बेलापूर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे लाइनच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. अशा स्थितीत गावात कोणाचे मयत झाले तर त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत कशी न्यायची, असा सवाल ग्रामस्थांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस सुधीर पाटील यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांना एक लेखी निवेदन देवून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशीही त्यांनी यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)