शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपणारे फाऊंडेशन, पर्यावरण रक्षणाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:14 IST

कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. देशात धगधगती युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची ज्योत पेटवण्याची गरज आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपण्याचे काम गेली १७ वर्षे महाडमध्ये दिलासा फाउंडेशन ही संस्था करीत आहे.जिथे अडचण आहे, ज्यांना मदत पाहिजे त्यांच्यासाठी ‘दिलासा’ हे बिरूद लावणा-या दिलासा फाउंडेशनचे किरण क्षीरसागर आणि त्यांच्या टीमचे काम थक्क करणारे असेच आहे. ऐतिहासिक महाड तालुक्यातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताच्या कामाला सुरुवात केली. रसायनशास्त्रातील पदवीधर क्षीरसागर यांनी एमएसडब्ल्यू देखील केले आहे. देशभरात सुरू असलेल्या शौचालय उभारणीच्या मोहिमेत ते रायगड जिल्ह्यात मोलाचे काम करीत आहेत. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यासाठी ते ग्रामपंचायतींना मदत करतात. मुख्य संसाधन संस्था म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.सरकारने वैयक्तिक शौचालय उभारण्याची योजना आणली; परंतु ती कशी राबवायची. यासाठी दिलासा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आराखडा तयार करून देण्याचे काम करते. शौचालय बांधल्यावर त्याचा वापर करा, तसेच शौचालयासाठी शोषखड्डेच करा, असा आग्रहही त्यांच्याकडून केला जातो.सांडपाणी, कचरा व्यवस्थापन गरजेचेसांडपाणी आणि कचरा यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला याची सवय लागण्यासाठी कचºयाचा विषय अर्थकारणाशी जोडला पाहिजे. कचºयापासून पैसा उपलब्ध होऊ शकतो हे एकदा का माणसांच्या मनात बिंबवले की, याबाबतची मोठी चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही.कचºयावर भविष्यात एखादी मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते. ‘शून्य कचरा’ याबाबत विविध ठिकाणी जागरूकता केली जात आहे. युवाशक्तीचा यामध्ये अद्यापही उपयोग केला जात नाही, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.धगधगत्या युवाशक्तीला चेतविण्याची गरज आहे. आज प्रत्येकाने स्वच्छतेच्याबाबतीमध्ये जागरूक राहिले पाहिजे, तसे न केल्यास नियतीच आपणाला तसे करण्याला भाग पाडेल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान