शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपणारे फाऊंडेशन, पर्यावरण रक्षणाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:14 IST

कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. देशात धगधगती युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची ज्योत पेटवण्याची गरज आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपण्याचे काम गेली १७ वर्षे महाडमध्ये दिलासा फाउंडेशन ही संस्था करीत आहे.जिथे अडचण आहे, ज्यांना मदत पाहिजे त्यांच्यासाठी ‘दिलासा’ हे बिरूद लावणा-या दिलासा फाउंडेशनचे किरण क्षीरसागर आणि त्यांच्या टीमचे काम थक्क करणारे असेच आहे. ऐतिहासिक महाड तालुक्यातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताच्या कामाला सुरुवात केली. रसायनशास्त्रातील पदवीधर क्षीरसागर यांनी एमएसडब्ल्यू देखील केले आहे. देशभरात सुरू असलेल्या शौचालय उभारणीच्या मोहिमेत ते रायगड जिल्ह्यात मोलाचे काम करीत आहेत. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यासाठी ते ग्रामपंचायतींना मदत करतात. मुख्य संसाधन संस्था म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.सरकारने वैयक्तिक शौचालय उभारण्याची योजना आणली; परंतु ती कशी राबवायची. यासाठी दिलासा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आराखडा तयार करून देण्याचे काम करते. शौचालय बांधल्यावर त्याचा वापर करा, तसेच शौचालयासाठी शोषखड्डेच करा, असा आग्रहही त्यांच्याकडून केला जातो.सांडपाणी, कचरा व्यवस्थापन गरजेचेसांडपाणी आणि कचरा यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला याची सवय लागण्यासाठी कचºयाचा विषय अर्थकारणाशी जोडला पाहिजे. कचºयापासून पैसा उपलब्ध होऊ शकतो हे एकदा का माणसांच्या मनात बिंबवले की, याबाबतची मोठी चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही.कचºयावर भविष्यात एखादी मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते. ‘शून्य कचरा’ याबाबत विविध ठिकाणी जागरूकता केली जात आहे. युवाशक्तीचा यामध्ये अद्यापही उपयोग केला जात नाही, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.धगधगत्या युवाशक्तीला चेतविण्याची गरज आहे. आज प्रत्येकाने स्वच्छतेच्याबाबतीमध्ये जागरूक राहिले पाहिजे, तसे न केल्यास नियतीच आपणाला तसे करण्याला भाग पाडेल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान