शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपणारे फाऊंडेशन, पर्यावरण रक्षणाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:14 IST

कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. देशात धगधगती युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची ज्योत पेटवण्याची गरज आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपण्याचे काम गेली १७ वर्षे महाडमध्ये दिलासा फाउंडेशन ही संस्था करीत आहे.जिथे अडचण आहे, ज्यांना मदत पाहिजे त्यांच्यासाठी ‘दिलासा’ हे बिरूद लावणा-या दिलासा फाउंडेशनचे किरण क्षीरसागर आणि त्यांच्या टीमचे काम थक्क करणारे असेच आहे. ऐतिहासिक महाड तालुक्यातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताच्या कामाला सुरुवात केली. रसायनशास्त्रातील पदवीधर क्षीरसागर यांनी एमएसडब्ल्यू देखील केले आहे. देशभरात सुरू असलेल्या शौचालय उभारणीच्या मोहिमेत ते रायगड जिल्ह्यात मोलाचे काम करीत आहेत. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यासाठी ते ग्रामपंचायतींना मदत करतात. मुख्य संसाधन संस्था म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.सरकारने वैयक्तिक शौचालय उभारण्याची योजना आणली; परंतु ती कशी राबवायची. यासाठी दिलासा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आराखडा तयार करून देण्याचे काम करते. शौचालय बांधल्यावर त्याचा वापर करा, तसेच शौचालयासाठी शोषखड्डेच करा, असा आग्रहही त्यांच्याकडून केला जातो.सांडपाणी, कचरा व्यवस्थापन गरजेचेसांडपाणी आणि कचरा यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला याची सवय लागण्यासाठी कचºयाचा विषय अर्थकारणाशी जोडला पाहिजे. कचºयापासून पैसा उपलब्ध होऊ शकतो हे एकदा का माणसांच्या मनात बिंबवले की, याबाबतची मोठी चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही.कचºयावर भविष्यात एखादी मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते. ‘शून्य कचरा’ याबाबत विविध ठिकाणी जागरूकता केली जात आहे. युवाशक्तीचा यामध्ये अद्यापही उपयोग केला जात नाही, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.धगधगत्या युवाशक्तीला चेतविण्याची गरज आहे. आज प्रत्येकाने स्वच्छतेच्याबाबतीमध्ये जागरूक राहिले पाहिजे, तसे न केल्यास नियतीच आपणाला तसे करण्याला भाग पाडेल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान