शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

‘रोहयो’साठी निधी कमी पडणार नाही

By admin | Updated: March 17, 2017 05:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कामे घेताना काही निकष अडचणीचे ठरत असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निकषात बदल करता येतील, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र ममंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी येथे बोलताना दिले.केंद्र सरकार पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गीते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रायगड जिल्ह्यात मनरेगाची ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून ४ हजार ९२ तर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून २ हजार ५९५ अशी एकूण ६ हजार ६८७ कामे प्रस्तावित असून त्यापैकी १४४ कामे जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरू आहेत. योजनेच्या निकषांमधील काही अडचणींमुळे कामे होऊ शकत नसल्याचे बैठकीत लक्षात आल्यावर गीते यांनी निकष बदलाबाबत निर्देश दिले आहेत. जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसाहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१८ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने संबंधित यंत्रणेने काम करावे, असेही गीते यांनी सांगितले.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेली कामे मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जी कामे अद्याप सुरू नाहीत ती तत्काळ सुरू करावीत, असे त्यांनी सांगून जिल्ह्यात असलेल्या खाड्यांमधून जलप्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पंचायत समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आभार मानले.