शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू

By admin | Updated: February 1, 2016 01:42 IST

‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे

प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबई‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ओला कचरा, निर्माल्य, झाडाचा पालापाचोळा या अशा टाकाऊ कचऱ्यातून खत आणि इंधन तयार केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांना प्रकल्पाचा लाभ घेता येणार, हरित नवी मुंबई प्रकल्पालाही हातभार लावला जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका आणि निसर्गप्रेमी फाऊंडेशनच्या वतीने सानपाडा परिसरातील पर्यावरणस्नेहींनी एकत्र येऊन या प्रकल्पाला सुरुवात केली असून गेली १० वर्षे या संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करुन टाकाऊतून टिकाऊ या प्रकल्पाला खरी सुरुवात झाली आहे. सानपाडा रेल्वे स्थानकालगत असलेल्या ओसाड जमिनीवर वृक्षलागवड करुन त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून त्यामध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात खतनिर्मिती केली जात आहे. तसेच या ठिकाणी बायोवेस्ट कंपोस्टिंग मशीन, काडीकचरा इंधननिर्मिती यंत्रही येथे ठेवण्यात आले आहे. यातून निर्माण झालेले खत नागरिकांना मोफत दिले जाणार असून प्रत्येकाला घरी झाडे लावण्याचे आवाहनही केले जात आहे. शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान विषयात असलेल्या कंपोस्ट खत कसे तयार करतात, इंधननिर्मिती कशी केली जाते याबाबतही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहण्याची संधी दिली जाणार असल्याचे निसर्गप्रेमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले. उपक्रमांतर्गत सानपाड्यातील सर्वच सोसायट्यांमधील कचरा, निर्माल्याच्या माध्यमातून खतनिर्मिती तसेच इंधन निर्मितीचा प्रकल्प राबविला जात आहे. नाला, तलाव, समुद्रकिनारी निर्माल्य टाकल्याने शहराचे विद्रूपीकरण तर होतेच त्याबरोबर या नैसर्गिक घटकांचेही प्रदूषण होत असल्याने हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याची माहिती या संघटनेने दिली. शहरातील इतरही विभागांमध्ये अशाप्रकारचा उपक्रम राबवायचा असेल तर या निसर्गप्रेमी फाऊंडेशच्या सदस्यांच्या मदतीने नागरिकांना परिसरातही हा उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि साहित्य पुरविण्याचे आवाहन या निसर्गप्रेमींनी केले आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, स्थानिक नगरसेविका रुचा पाटील, उपआयुक्त बाबासाहेब राजाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. एस.व्ही. पत्तीवार आदी उपस्थित होते.