शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

मराठा क्रांतीचा २१ सप्टेंबरला मोर्चा

By admin | Updated: September 13, 2016 02:58 IST

बीड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रायगडात मराठा

पनवेल : बीड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रायगडात मराठा क्र ांती मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवणे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे, मराठा आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी कोकण भवन कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असून त्याच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तयारीला लागले आहेत. कोपर्डी घटनेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: मराठा समाजात या घटनेनंतर उद्रेकाची भावना आहे. त्यातूनच हा समाज पेटून उठला आहे. राज्यात बीड, औरंगाबादसह ठिकठिकाणी मोर्चे निघाले. त्याच धर्तीवर रायगडमध्येही ऐतिहासिक मराठा क्र ांती मोर्चाचे नियोजन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली आहे. मोर्चात सर्वपक्षीय मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. २१ सप्टेंबरला खारघर येथून महामार्गाने कोकण भवन येथे आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. मोर्चात रायगड व नवी मुंबईतील लाखो मराठा समाजाचे नागरिक, महिला तसेच विद्यार्थी सहभागी होतील, असा अंदाज आहे.