शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 01:09 IST

नियमांना बगल

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरीत्या होत असलेल्या मालवाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही उघडपणे ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत आहे. अशा ट्रॅव्हल्सवरील कारवाईकडे आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागांतील प्रवाशांसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईला जोडले गेलेले आहे. त्यानुसार नवी मुंबईतून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करतात. लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्सला लागलेला ब्रेक आता अनलॉकमध्ये हटला आहे. परंतु प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना बहुतांश ट्रॅव्हल्स कुरियरच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत होणारा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात ट्रॅव्हल्समधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मालवाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. अशाच प्रकरणातून शनिवारी ३५ प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आकांक्षा ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडे येत असताना सानपाडा येथे बसला आग लागली. बसमधील कुरियरचे साहित्य उतरविले जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेवेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते, त्यापैकी एकाला दुखापत झाली आहे. तर बस थांबलेली असल्याने प्रवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.बसला लागलेली आग विझविताना बसच्या डिक्कीत औषधे व इतर सामान असल्याचे आढळून आले. त्यात सॅनिटायझरचादेखील साठा होता असे समजते. त्यामुळेच क्षणांत संपूर्ण बस जळून खाक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTravel Tipsट्रॅव्हल टिप्स