शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 01:09 IST

नियमांना बगल

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरीत्या होत असलेल्या मालवाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही उघडपणे ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत आहे. अशा ट्रॅव्हल्सवरील कारवाईकडे आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागांतील प्रवाशांसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईला जोडले गेलेले आहे. त्यानुसार नवी मुंबईतून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करतात. लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्सला लागलेला ब्रेक आता अनलॉकमध्ये हटला आहे. परंतु प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना बहुतांश ट्रॅव्हल्स कुरियरच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत होणारा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात ट्रॅव्हल्समधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मालवाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. अशाच प्रकरणातून शनिवारी ३५ प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आकांक्षा ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडे येत असताना सानपाडा येथे बसला आग लागली. बसमधील कुरियरचे साहित्य उतरविले जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेवेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते, त्यापैकी एकाला दुखापत झाली आहे. तर बस थांबलेली असल्याने प्रवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.बसला लागलेली आग विझविताना बसच्या डिक्कीत औषधे व इतर सामान असल्याचे आढळून आले. त्यात सॅनिटायझरचादेखील साठा होता असे समजते. त्यामुळेच क्षणांत संपूर्ण बस जळून खाक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTravel Tipsट्रॅव्हल टिप्स