शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

चौथ्या खाडीपुलाचा स्थानिक मच्छीमारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:35 IST

बाधितांचे पुनर्वसन करण्याची मागणी

नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीत चौथा पूल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने केली असून, मागण्या मान्य न केल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.एमएसआरडीसीच्या वतीने चौथ्या खाडीपुलाचे काम करण्यात येणार आहे. कामाला मंजुरी देताना त्याचा स्थानिकांच्या रोजगारावर काय परिणाम होणार, याचा विचार केलेला नाही. या कामामुळे स्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे वाशीसह नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंताेष निर्माण झाला. याविषयी माहिती देण्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व निशांत भगत यांनी मच्छीमार हक्क चळवळ उभी करून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. खाडीपुलाला आमचा विरोध नाही, परंतु पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी यामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.वाशी खाडीमध्ये मासेमारी करणारे, डोलवाले, फगवाले, तरती जाळे, बुडीची जाळे, असुवाले, निवठ्या पकडणारे, गळवाले, जाळीवाले, शिंपल्या, कालवाचे गोळे व खुबे गोळा करणारे, कांदळवनातील खेकडे पकडणारे या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याशिवाय मासेविक्री करणाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. नियमाप्रमाणे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा परिणामाविषयी अहवाल तयार करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे एमएसआरडीसीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. १५ दिवसांमध्ये एमएसआरडीसीने याविषयी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या प्रमुख मागण्या  मासेमारीसाठी समुद्रात १२ नॉटिकलच्या पुढे मासेमारी करता यावी यासाठी बोटी, जाळी व इतर सुविधा द्याव्यात पुलाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के विविध कामांचे ठेेके देण्यात यावेत. प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. प्रकल्पबाधितांना एपीएमसीच्या धर्तीवर मार्केट बांधून द्यावे. मच्छी विक्रेते व मच्छीमार यांना छोट्या शीतपेट्या द्याव्यात. वाशीमधील बाधित होणाऱ्या दशक्रिया घाटाच्या जागेवर नवीन घाट बांधून देणे. वाशी गाव मच्छीमार बांधवांना पुलाकडे जेट्टीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड बांधणे. वाशी गावालगत महामार्गाला मंजूर सर्व्हिस रस्ता त्वरित चालू करणे. विस्थापित होणारांचे पुनर्वसन करावे.चौथ्या खाडीपुलाला आमचा विरोध नाही. परंतु पुलामुळे विस्थापित होणारांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. १५ दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- दशरथ भगत, अध्यक्ष, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था