शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

चौथ्या खाडीपुलाचा स्थानिक मच्छीमारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:35 IST

बाधितांचे पुनर्वसन करण्याची मागणी

नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीत चौथा पूल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने केली असून, मागण्या मान्य न केल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.एमएसआरडीसीच्या वतीने चौथ्या खाडीपुलाचे काम करण्यात येणार आहे. कामाला मंजुरी देताना त्याचा स्थानिकांच्या रोजगारावर काय परिणाम होणार, याचा विचार केलेला नाही. या कामामुळे स्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे वाशीसह नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंताेष निर्माण झाला. याविषयी माहिती देण्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व निशांत भगत यांनी मच्छीमार हक्क चळवळ उभी करून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. खाडीपुलाला आमचा विरोध नाही, परंतु पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी यामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.वाशी खाडीमध्ये मासेमारी करणारे, डोलवाले, फगवाले, तरती जाळे, बुडीची जाळे, असुवाले, निवठ्या पकडणारे, गळवाले, जाळीवाले, शिंपल्या, कालवाचे गोळे व खुबे गोळा करणारे, कांदळवनातील खेकडे पकडणारे या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याशिवाय मासेविक्री करणाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. नियमाप्रमाणे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा परिणामाविषयी अहवाल तयार करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे एमएसआरडीसीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. १५ दिवसांमध्ये एमएसआरडीसीने याविषयी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या प्रमुख मागण्या  मासेमारीसाठी समुद्रात १२ नॉटिकलच्या पुढे मासेमारी करता यावी यासाठी बोटी, जाळी व इतर सुविधा द्याव्यात पुलाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के विविध कामांचे ठेेके देण्यात यावेत. प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. प्रकल्पबाधितांना एपीएमसीच्या धर्तीवर मार्केट बांधून द्यावे. मच्छी विक्रेते व मच्छीमार यांना छोट्या शीतपेट्या द्याव्यात. वाशीमधील बाधित होणाऱ्या दशक्रिया घाटाच्या जागेवर नवीन घाट बांधून देणे. वाशी गाव मच्छीमार बांधवांना पुलाकडे जेट्टीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड बांधणे. वाशी गावालगत महामार्गाला मंजूर सर्व्हिस रस्ता त्वरित चालू करणे. विस्थापित होणारांचे पुनर्वसन करावे.चौथ्या खाडीपुलाला आमचा विरोध नाही. परंतु पुलामुळे विस्थापित होणारांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. १५ दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- दशरथ भगत, अध्यक्ष, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था