शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पाच महिन्यांत चौदा हत्या

By admin | Updated: May 15, 2017 00:48 IST

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच महिन्यांत हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पोलिसांना यश

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच महिन्यांत हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. वाढत्या हत्येच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील काही वर्षात नियंत्रणात आलेली नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे. घरफोडी, जबरी चोरी, लूट यासह हत्येचे गुन्हे देखील घडू लागले आहेत. गेल्या पाच महिन्यांत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी परिमंडळ एकमध्ये दहा तर परिमंडळ दोनमध्ये चार घटना घडलेल्या आहेत. तर अवघ्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीतच चार घटना घडल्या आहेत. आयुक्तालय क्षेत्रात २०१५ मध्ये ४९ तर गतवर्षी ४२ हत्या झालेल्या आहेत. काही प्रकरणात महिलांची हत्या झाली असून, पतीनेच हत्या करुन पळ काढल्याचेही प्रकार आहेत. तीन महिन्यांपूर्वी पनवेल येथे महिलेचे तुकडे करुन टाकण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण कसून तपास करुन महिलेच्या मारेकऱ्यांना अटक केलेली आहे. परंतु नेवाळी गाव येथे अज्ञात व्यक्तीची जाळून झालेल्या हत्येचे गूढ अद्यापही कायम असून मारेकरीही मोकाट आहेत. अशा इतरही अनेक हत्येच्या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. २०१५ मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांची उकल झालेली नाही. मात्र २०१६ मध्ये घडलेल्या ४२ गुन्ह्यांपैकी ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने अद्याप उकल न झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.