शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

पाच महिन्यांत चौदा हत्या

By admin | Updated: May 15, 2017 00:48 IST

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच महिन्यांत हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पोलिसांना यश

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच महिन्यांत हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. वाढत्या हत्येच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील काही वर्षात नियंत्रणात आलेली नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे. घरफोडी, जबरी चोरी, लूट यासह हत्येचे गुन्हे देखील घडू लागले आहेत. गेल्या पाच महिन्यांत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी परिमंडळ एकमध्ये दहा तर परिमंडळ दोनमध्ये चार घटना घडलेल्या आहेत. तर अवघ्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीतच चार घटना घडल्या आहेत. आयुक्तालय क्षेत्रात २०१५ मध्ये ४९ तर गतवर्षी ४२ हत्या झालेल्या आहेत. काही प्रकरणात महिलांची हत्या झाली असून, पतीनेच हत्या करुन पळ काढल्याचेही प्रकार आहेत. तीन महिन्यांपूर्वी पनवेल येथे महिलेचे तुकडे करुन टाकण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण कसून तपास करुन महिलेच्या मारेकऱ्यांना अटक केलेली आहे. परंतु नेवाळी गाव येथे अज्ञात व्यक्तीची जाळून झालेल्या हत्येचे गूढ अद्यापही कायम असून मारेकरीही मोकाट आहेत. अशा इतरही अनेक हत्येच्या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. २०१५ मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांची उकल झालेली नाही. मात्र २०१६ मध्ये घडलेल्या ४२ गुन्ह्यांपैकी ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने अद्याप उकल न झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.