शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण : दुसरा टप्पा लवकरच

By admin | Updated: June 1, 2017 05:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम कागदोपत्री शेवटच्या टप्प्यात असून भूसंपादन केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम कागदोपत्री शेवटच्या टप्प्यात असून भूसंपादन केलेल्या रस्त्याच्या जागांचे पैसे अदा करण्याचे काम सुरु झाले आहे. महामार्गाची ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने रस्ता मजबुतीकरणासाठी महामार्गावर धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली आहे. ठेकेदार कंपनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने आणि पैसे वाटपाचे काम सुरु झाल्याने येत्या काही दिवसातच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु होईल असे चित्र दिसू लागले आहे.पनवेल ते इंदापूर हा मुंबई- गोवा महामार्गाचा पहिला टप्पा अतिशय संथगतीने पूर्ण होत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त कधी मिळणार याबाबत दक्षिण रायगड आणि कोकणस्थ जनतेला संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून शासकीय अधिकाऱ्यांमार्फत रस्त्यांची मापन भूसंपादन केलेल्या जागेच्या मालकांना नोटिसी या पातळीवर काम सुरु होते. मागील आठवड्यात भूसंपादन केलेल्या जागांचा मोबदला वाटप करण्यास प्रारंभ झाला. यानंतर रस्ता चौपदरीकरण निश्चित झाले असले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार या बाबतची शंका कायम होती. मात्र चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई-गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली. इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्यादरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत कंपनीमार्फत ही चाचणी सुरु झाली आहे.इलेक्ट्रॉनिक पध्दतीचा वजन काटा वापरुन वजनी गाड्यांचे वजन करण्याचे काम केले जात आहे. प्रतिदिन ३०० गाड्यांची चाचणी अशी दोन दिवसात दोन ठिकाणी ६०० गाड्यांची चाचणी करण्यात आली. महामार्गावर धावणाऱ्या वजनी गाड्यांच्या प्रमाणात नवीन होणाऱ्या महामार्गाची क्षमता निश्चित केली जाणार आहे.मूळचा मुंबई-गोवा महामार्ग अरुंद असून केवळ ३५ टन क्षमतेकरिता तयार करण्यात आला होता. स्पाथ कंपनीतून आणि औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या गाड्या ३५ टनपेक्षा जास्त माल या महामार्गावरुन वाहतूक करत होत्या. मूळचा अरुंद रस्ता आणि क्षमतेपेक्षा अधिक (ओव्हरलोड) वाहतूक यामुळे महामार्गावरील खड्ड्यांचे संकट कधी दूर झालेच नाही. बुधवारी झालेल्या या चाचणीमध्ये ५१ टन वजनी गाड्या महामार्गावरुन धावत असण्याचे स्पष्ट झाले. ओव्हरलोड वाहतूक हा विषय महामार्ग पोलीस आणि आरटीओ या दोन खात्यांकडे येतो. महामार्गाची दुरुस्ती लक्षात घेता अशा ओव्हरलोड गाड्यांवर महामार्ग बांधकाम विभागाने देखील लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र या तिन्ही विभागाने कधीही अशा प्रकारे चाचणी करुन ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई कधी केलीच नाही. महामार्गाचा ठेकेदार कंपनी एल. अ‍ॅण्ड टी. ने बुधवारी केलेल्या चाचणीमध्ये महामार्गावरील ओव्हरलोड वाहतूक आरटीओ महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभाग यांच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवून दिले आहे.चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई -गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली.इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्या दरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत चाचणी सुरु झाली आहे. महामार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी कंपनीमार्फत वजनदार गाड्यांच्या सर्व्हेचे काम सुरु आहे. या माध्यमातून नवीन होणाऱ्या रस्त्याची वजन सहन करण्याची क्षमता निश्चित केली जाईल, त्यानुसार पुढील काम सुरु करण्यात येईल. - संदीप शानबाग, सहाय्यक अभियंता एल.अ‍ॅण्ड टी. कंपनी मुंबई.