शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण : दुसरा टप्पा लवकरच

By admin | Updated: June 1, 2017 05:27 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम कागदोपत्री शेवटच्या टप्प्यात असून भूसंपादन केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम कागदोपत्री शेवटच्या टप्प्यात असून भूसंपादन केलेल्या रस्त्याच्या जागांचे पैसे अदा करण्याचे काम सुरु झाले आहे. महामार्गाची ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने रस्ता मजबुतीकरणासाठी महामार्गावर धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली आहे. ठेकेदार कंपनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने आणि पैसे वाटपाचे काम सुरु झाल्याने येत्या काही दिवसातच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु होईल असे चित्र दिसू लागले आहे.पनवेल ते इंदापूर हा मुंबई- गोवा महामार्गाचा पहिला टप्पा अतिशय संथगतीने पूर्ण होत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त कधी मिळणार याबाबत दक्षिण रायगड आणि कोकणस्थ जनतेला संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून शासकीय अधिकाऱ्यांमार्फत रस्त्यांची मापन भूसंपादन केलेल्या जागेच्या मालकांना नोटिसी या पातळीवर काम सुरु होते. मागील आठवड्यात भूसंपादन केलेल्या जागांचा मोबदला वाटप करण्यास प्रारंभ झाला. यानंतर रस्ता चौपदरीकरण निश्चित झाले असले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार या बाबतची शंका कायम होती. मात्र चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई-गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली. इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्यादरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत कंपनीमार्फत ही चाचणी सुरु झाली आहे.इलेक्ट्रॉनिक पध्दतीचा वजन काटा वापरुन वजनी गाड्यांचे वजन करण्याचे काम केले जात आहे. प्रतिदिन ३०० गाड्यांची चाचणी अशी दोन दिवसात दोन ठिकाणी ६०० गाड्यांची चाचणी करण्यात आली. महामार्गावर धावणाऱ्या वजनी गाड्यांच्या प्रमाणात नवीन होणाऱ्या महामार्गाची क्षमता निश्चित केली जाणार आहे.मूळचा मुंबई-गोवा महामार्ग अरुंद असून केवळ ३५ टन क्षमतेकरिता तयार करण्यात आला होता. स्पाथ कंपनीतून आणि औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या गाड्या ३५ टनपेक्षा जास्त माल या महामार्गावरुन वाहतूक करत होत्या. मूळचा अरुंद रस्ता आणि क्षमतेपेक्षा अधिक (ओव्हरलोड) वाहतूक यामुळे महामार्गावरील खड्ड्यांचे संकट कधी दूर झालेच नाही. बुधवारी झालेल्या या चाचणीमध्ये ५१ टन वजनी गाड्या महामार्गावरुन धावत असण्याचे स्पष्ट झाले. ओव्हरलोड वाहतूक हा विषय महामार्ग पोलीस आणि आरटीओ या दोन खात्यांकडे येतो. महामार्गाची दुरुस्ती लक्षात घेता अशा ओव्हरलोड गाड्यांवर महामार्ग बांधकाम विभागाने देखील लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र या तिन्ही विभागाने कधीही अशा प्रकारे चाचणी करुन ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई कधी केलीच नाही. महामार्गाचा ठेकेदार कंपनी एल. अ‍ॅण्ड टी. ने बुधवारी केलेल्या चाचणीमध्ये महामार्गावरील ओव्हरलोड वाहतूक आरटीओ महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभाग यांच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवून दिले आहे.चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अ‍ॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई -गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली.इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्या दरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत चाचणी सुरु झाली आहे. महामार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी कंपनीमार्फत वजनदार गाड्यांच्या सर्व्हेचे काम सुरु आहे. या माध्यमातून नवीन होणाऱ्या रस्त्याची वजन सहन करण्याची क्षमता निश्चित केली जाईल, त्यानुसार पुढील काम सुरु करण्यात येईल. - संदीप शानबाग, सहाय्यक अभियंता एल.अ‍ॅण्ड टी. कंपनी मुंबई.