शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:29 IST

आगीचा धोका । वडापाव, चायनीसविक्रेत्यांवरील कारवाईत पालिका उदासीन

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत. तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजवणाºया विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत. याकरिता घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थविक्रेते महत्त्वाचे चौक व रदहारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. तर त्यांच्याकडून विकले जाणारे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागासह अतिक्रमण विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. बारच्या मार्गावर, मद्यविक्री केंद्राबाहेर, रेल्वेस्थानकसमोरील चौक, जास्त वर्दळ असलेले चौक याशिवाय अनेक विभाग कार्यालयाजवळही असे खाद्यपदार्थविक्रेते दिसून येत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केलेल्या आहेत. यानंतरही उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवणाºयांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.नागरिकांच्या सुरक्षाप्रकरणी पोलिसांकडून मोहीम१अखेर उघड्यावर ज्वलनशील वस्तूंचा वापर करून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत सीबीडी, रबाळे, एनआरआय पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.३परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तशा प्रकारच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत; परंतु पालिकेकडून मात्र अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत वडापाव, भुर्जीपाव व चायनीसच्या गाड्या दिसून येत आहेत.उघड्यावर अन्नपदार्थ शिजवणाºयांकडून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे पदपथांवर, सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ शिजवणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.- पंकज डहाणे,पोलीस उपायुक्त