शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:29 IST

आगीचा धोका । वडापाव, चायनीसविक्रेत्यांवरील कारवाईत पालिका उदासीन

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत. तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजवणाºया विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत. याकरिता घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थविक्रेते महत्त्वाचे चौक व रदहारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. तर त्यांच्याकडून विकले जाणारे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागासह अतिक्रमण विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. बारच्या मार्गावर, मद्यविक्री केंद्राबाहेर, रेल्वेस्थानकसमोरील चौक, जास्त वर्दळ असलेले चौक याशिवाय अनेक विभाग कार्यालयाजवळही असे खाद्यपदार्थविक्रेते दिसून येत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केलेल्या आहेत. यानंतरही उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवणाºयांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.नागरिकांच्या सुरक्षाप्रकरणी पोलिसांकडून मोहीम१अखेर उघड्यावर ज्वलनशील वस्तूंचा वापर करून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत सीबीडी, रबाळे, एनआरआय पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.३परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तशा प्रकारच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत; परंतु पालिकेकडून मात्र अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत वडापाव, भुर्जीपाव व चायनीसच्या गाड्या दिसून येत आहेत.उघड्यावर अन्नपदार्थ शिजवणाºयांकडून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे पदपथांवर, सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ शिजवणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.- पंकज डहाणे,पोलीस उपायुक्त