शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शहरात फुलांची उलाढाल ८० लाखांवर, नाशिक, पुण्यातून गुलाबांची आवक : अतिवृष्टीमुळे दरात तिपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:18 IST

गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो.

प्राची सोनवणेनवी मुंबई : गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो. या सात दिवसांमध्ये फुलांनामोठ्या प्रमाणात मागणी असून,नवी मुंबई, पनवेल परिसरात ८०लाख रुपयांची उलाढाल झाल्याची तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढल्याने शेतकºयांना चांगला मोबदला मिळत असल्याची माहिती फूलबाजारातील व्यापाºयांनी दिली.थायलंडवरूनही मोठ्या प्रमाणात आॅर्किडच्या फुलांची आवक झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. ही फुले जास्त काळ टिकत असल्याने गणेशोत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणात मागणी असते. गणेशोत्सव आणि गौरी आगमनामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. केवळ गणेश मंडळेच नव्हे तर घरगुती मूर्तींच्या सजावटीसाठी देखील फुलांचामोठ्या प्रमाणात वापर केलाजात आहे. त्यामुळे सजावटीसाठी फुलांच्या मागणीत वाढझाली आहे. फुलांबरोबरच सजावटीसाठी फिलर्स म्हणून वापरल्या जाणाºया विविध प्रकारच्या पानांची आवक चांगली होत आहे. बंगळुरू, कोलकाता, नशिक, पुणे येथील बाजारांतून फुलांची तसेच पानांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.लिली, गुलछडी, गुलाब या फुलांबरोबरच आता कार्नेशन, जरबेरा, ग्लॅडिएटर, लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड या फुलांचीही गणेश भक्तांना ओळख झाली आहे. दोन ते तीन दिवस ही फुले टिकत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. सजावटीमध्ये डेसिना, आरेका पाम, सायकस, टेबल पाम, फिश पाम, साँग आॅफ इंडिया अशा विविध प्रकारच्या पानांचा फिलर्स म्हणून वापर केल्याने सजावटीमधील सौंदर्य खुलण्यास मदत होत आहे.पूजेसाठी वापरल्या जाणाºया फुलांना अपेक्षेप्रमाणे मागणी असली तरी सजावटीच्या फुलांना ही ठरावीक कालावधीतच मागणी असते. लग्नसराई, दसरा, दिवाळी या कालावधीपेक्षा गणेशोत्सवात सजावटीच्या फुलांना मागणी असून इको फे्रंडली सजावटीकरिता या फुलांचा वापर केला जातो. नाशिकहून बटण गुलाबांची आवक केली जात असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.अतिवृष्टीमुळे फुलांचे भाव तिपटीने वाढले असून २० ते ४० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले १२० ते १६० रुपये किलोने विकली जात आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने विकली जाणारी गुलछडी ३२० ते ३५० रुपये किलोने विकली जात आहे. वसईहून जास्वंद, तुळस आणि बेलपत्राची आवक होत असून गौरीपूजनाच्या दिवशी याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. बहुतेक फुले ही गोवा, उटी, बंगळुरू, कोलकाता येथून येत असल्याची माहिती व्यापारी विकास भोपी यांनी दिली.