शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कोथुर्डे’वरील पाच गावांना पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: April 19, 2017 00:41 IST

लघुपाटबंधारे विभागाच्या मालकीचे रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यात कोथुर्डे धरण आहे. या धरणावर १९ गावे आणि महाड नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

सिकंदर अनवारे, दासगावलघुपाटबंधारे विभागाच्या मालकीचे रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यात कोथुर्डे धरण आहे. या धरणावर १९ गावे आणि महाड नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. महाड नगरपालिका पाइपलाइनद्वारे थेट पाणी धरणातून उचलते, तर १९ गावांना गांधारी नदीद्वारे पाणीपुरवठा होतो. यामुळे नगरपालिकेद्वारे पाणीटंचाईच्या काळात थोडे का होईना पाणी मिळते. मात्र ग्रामीण भागातील काही गावांना पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. सध्या धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाणी गांधारी नदी कोरडी झाल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या पाच गावांच्या जॅकवेलपर्यंत पोहोचत नाही. यामुळे या गावांची नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. तसेच सध्या या गावांच्या विहिरी कोरड्या पडल्या असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. कोथुुर्डे धरणाच्या पाण्यावर १९ गावे व महाड नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. दरवर्षी हे धरण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आटते. मात्र या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली १९ पैकी काहीच गावांना याचा दरवर्षीच फटका बसतो. मात्र या पाण्यावर अवलंबून असणारी इतर गावे ठिकठिकाणी पाणी अडवून ठेवत असल्याने त्यांना फरक पडत नाही. मात्र गांधारी नदीच्या महाड शहरानजीक असलेल्या दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर, गांधारपाले या गावांना दरवर्षी याचा फटका बसतो.कोथुर्डे धरण १९७१ साली बांधण्यात आले. सुरु वातील काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली. मात्र दोन वर्षापूर्वी या धरणाला भगदाड पडले होते. ही नळपाणी पुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गी होती. परंतु डागडुजीमुळे पुन्हा या धरणाला जिवंत करण्यात आले. या धरणाची डागडुजी जरी करण्यात आली असली तरी गेल्या ४० वर्षांमध्ये या धरणामधून गाळ काढण्याचे काम करण्यात आलेले नाही. या धरणामध्ये पाणी साठवण क्षमता २.७२० द. ल. घनमीटर एवढी आहे. या साचलेल्या गाळामुळे काही प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली आहे. तरी या धरणामध्ये असणारा पाण्याचा साठा १९ गावे व महाड नगरपालिकेला वर्षभर पुरेल एवढा आहे.धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे गांधारी नदीला सोडले जाते. १३ किमी अंतरावर या गांधारी नदीवर सर्व १९ गावांच्या जॅकवेल आहेत व या जॅकवेलद्वारे ठिकठिकाणी नदीतून पाणी उचलले जाते. या धरणामध्ये पाण्याचा साठा मुबलक असला तरी नदी कोरडी झाल्यानंतर या नदीला सोडण्यात येणारे धरणाचे पाणी जमिनीमध्ये झिरपते व त्याचा फटका महाड शहरानजीक धरणापासून १३ किमी अंतरावर असलेल्या गावांच्या जॅकवेलला बसतो. या जॅकवेलला धरणातून सोडण्यात आलेले पाणी आठ-दहा दिवस पोहचत नाही. परिणामी या गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प होते. महाड नगरपालिका पूर्वी याच नदीमधून जॅकवेलद्वारे पाणी उचलत होती. मात्र पाण्याची कमरतात पाहता थेट धरणातून पाइपलाइनने शहराला पाणीपुरवठा केल्याने शेवटच्या क्षणी देखील महाड नगरपालिकेला या धरणातून काही प्रमाणात का होईना पाणी मिळते.जॅकवेलला पाइपलाइन जोडली तर पाण्याची बचत होणे शक्य१धरणातून सोडण्यात येणारे पाणी १३ कि मी अंतरावर असलेल्या ५ गावांच्या जॅकवेलपर्यंत येईपर्यंत ठिकठिकाणी अडले जाते. इतर गावांच्या जॅकवेल यामध्ये अनेक ठिकाणी असल्याने त्या त्या गावांनी आपली नळपाणी पुरवठा योजना सुरू राहण्यासाठी ठिकठिकाणी जॅकवेलजवळ बंधारे बांधले आहेत. २तसेच या गांधारी नदीवर अनेक वीटभट्टी व्यावसायिक असून त्यांनी देखील हे पाणी अडवले आहे. त्यामुळे धरणातून सुटणाऱ्या पाण्याचे क्षेत्र पुढे वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढते. पाणी जमिनीत मुरते. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाते. दोन्ही कारणामुळे या महाड शहरानजीक असलेल्या ५ गावांची नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. ३लघु पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार अशी अनेक कारणे आहेत की ज्यांच्यामुळे सोडण्यात येणारे धरणाचे पाणी जवळपास ७० टक्के पाणी वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी याला एकच उपाय ज्या पद्धतीत महाड नगरपालिकेने थेट धरणातून पाइपलाइन आणली आहे त्याच पद्धतीत या १९ गावांच्या जॅकवेलला थेट पाइपलाइन जोडल्यास पाणी वायाही जाणार नाही व या येणाऱ्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही. उलट या धरणामध्ये पाणी शिल्लक राहील.