शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

By admin | Updated: December 12, 2015 01:50 IST

सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई : सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले. सागरी सुरक्षा अभेद्य करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाशी येथे सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल व पोलीस मित्र यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम असून प्रत्येक गैरहालचाल फेल करणारी उपाययोजना राबवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ६० कि.मी.चा समुद्र किनारा व ४४ कि.मी.चा खाडी किनारा लाभलेला आहे. त्यापैकी १२ किनारे हे धोक्याची घंटा असून त्याठिकाणची सुरक्षा सदैव सतर्क ठेवण्यात आलेली आहे.मुंबईवर हल्ला करण्यासाठी नवी मुंबई सागरी किनारा देखील वापरला जावू शकतो. यामुळे दुर्लक्षित असलेल्या जेट्टी व सागरी किनाऱ्यांच्याही सुरक्षेवर नवी मुंबईच्या विशेष शाखा पोलिसांनी भर दिलेला आहे. याकरिता मच्छीमार बांधवांनाही विश्वासात घेतले जात आहे. मासेमारीच्या निमित्ताने समुद्र अथवा खाडीमध्ये वावरत असलेल्या मच्छीमारांच्या निदर्शनास काही संशयास्पद हालचाली येवू शकतात. त्याचे गांभीर्य लक्षात घेवून ही बाब त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यास गुन्हेगारांचा प्रयत्न हाणून पाडला जावू शकतो. याकरिता मच्छीमार बांधव, सागर रक्षक दल व ग्रामरक्षक दल यांचा मेळावा वाशीतील भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी मच्छीमार बांधव हे पोलिसांचे नाक, कान डोळे असल्याचे सांगितले. सागरी सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी पोलीस झटतच असतात. मात्र मच्छीमार बांधवांनी देखील याकामी पोलिसांना साथ दिल्यास कोणताही गैरप्रकार घडण्यापूर्वीच तो टळू शकतो असेही ते म्हणाले. गत महिन्यात विशेष शाखा पोलिसांनी सागर कवच अभियान राबवले होते. यामध्ये चाचणी स्वरूपात तीन सागरी हल्ले घडवण्यात आले. मात्र हे तीनही हल्ले सागरी पोलिसांनी फेल करुन आपली कार्यक्षमता सिध्द केल्याचे विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास अप्पर आयुक्त विजय चव्हाण, उपआयुक्त शहाजी उमाप, नौदलाचे अमोल जाधव, तटरक्षक दलाचे अंकित शर्मा, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)