शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला दिवस व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 07:07 IST

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिका-यांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.

नवी मुंबई - अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिकाºयांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी २०१८ - १९ वर्षासाठी ३१५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी तब्बल १२ दिवसानंतर ५ ते ८ मार्च दरम्यान विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी जमेच्या बाजूवर चर्चा होणार होती. सभेचे कामकाज दिवसभर चालविणे आवश्यक होते, परंतु सदस्यांनी सुरुवातीला प्रत्येक विभागवार किती जमा होणार आहे याचे तपशील विभाग प्रमुखांना सादर करण्यास सांगितले.मुख्य लेखा व वित्त अधिका-यांसह शहर अभियंता व आरोग्य विभागापर्यंत सर्व विभागप्रमुखांनी आर्थिक वर्षामध्ये किती रक्कम जमा होणार याची माहिती सादर करण्यास सांगितले. अधिकाºयांनीही अंदाजपत्रकामध्ये दिलेली रक्कम वाचून दाखविली. यावर काही किरकोळ प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन तास सर्व विभागनिहाय माहिती मागविल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले. वास्तविक अर्थसंकल्पावरील चर्चा दिवसभर चालेल हे गृहीत धरून सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण काही सदस्यांच्या निरुत्साहामुळे व निरर्थक प्रश्न उपस्थित करण्याच्या धोरणामुळे चर्चेचा एक दिवस व्यर्थ गेला.स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर अनेक सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यांविषयीही नाराजी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी जमेच्या बाजूवर चर्चा करण्यासाठी मुद्दे तयार केले होते, परंतु चर्चाच होवू शकली नाही. पूर्ण दिवस व्यर्थ गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.वास्तविक आयुक्तांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत.अर्थसंकल्प सादर करताना पैसे कसे येणार याची सविस्तर माहिती दिली आहे. सदस्यांना अभ्यास करण्यासाठी १२ दिवसांची संधी दिली होती. यानंतर चर्चेच्या पहिल्याच दिवशी निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यात आले.स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर एवढी निरर्थक चर्चा झाल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. काही सदस्यांनी याविषयी सांगितले की, प्रशासनाने त्यांचे आकडे दिले आहेत. तेच आकडे पुन्हा वदवून घेण्यात काहीही अर्थ नाही. जमा व खर्चाच्या मुद्यावर सविस्तर तपशीलवार चर्चा व्हावी व सर्वांना चर्चा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.७ मार्चला सभा : अर्थसंकल्पावर ५ ते ७ मार्चपर्यंत तीन दिवस विशेष सभेचे आयोजन केले होते. यामधील पहिला दिवस व्यर्थ गेला असून ६ तारखेला सभा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७ मार्चला सभा होणार असून एक दिवसात जमा व खर्चावर चर्चा होणार की चर्चेचे दिवस वाढविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका