शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला दिवस व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 07:07 IST

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिका-यांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.

नवी मुंबई - अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिकाºयांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी २०१८ - १९ वर्षासाठी ३१५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी तब्बल १२ दिवसानंतर ५ ते ८ मार्च दरम्यान विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी जमेच्या बाजूवर चर्चा होणार होती. सभेचे कामकाज दिवसभर चालविणे आवश्यक होते, परंतु सदस्यांनी सुरुवातीला प्रत्येक विभागवार किती जमा होणार आहे याचे तपशील विभाग प्रमुखांना सादर करण्यास सांगितले.मुख्य लेखा व वित्त अधिका-यांसह शहर अभियंता व आरोग्य विभागापर्यंत सर्व विभागप्रमुखांनी आर्थिक वर्षामध्ये किती रक्कम जमा होणार याची माहिती सादर करण्यास सांगितले. अधिकाºयांनीही अंदाजपत्रकामध्ये दिलेली रक्कम वाचून दाखविली. यावर काही किरकोळ प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन तास सर्व विभागनिहाय माहिती मागविल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले. वास्तविक अर्थसंकल्पावरील चर्चा दिवसभर चालेल हे गृहीत धरून सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण काही सदस्यांच्या निरुत्साहामुळे व निरर्थक प्रश्न उपस्थित करण्याच्या धोरणामुळे चर्चेचा एक दिवस व्यर्थ गेला.स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर अनेक सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यांविषयीही नाराजी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी जमेच्या बाजूवर चर्चा करण्यासाठी मुद्दे तयार केले होते, परंतु चर्चाच होवू शकली नाही. पूर्ण दिवस व्यर्थ गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.वास्तविक आयुक्तांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत.अर्थसंकल्प सादर करताना पैसे कसे येणार याची सविस्तर माहिती दिली आहे. सदस्यांना अभ्यास करण्यासाठी १२ दिवसांची संधी दिली होती. यानंतर चर्चेच्या पहिल्याच दिवशी निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यात आले.स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर एवढी निरर्थक चर्चा झाल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. काही सदस्यांनी याविषयी सांगितले की, प्रशासनाने त्यांचे आकडे दिले आहेत. तेच आकडे पुन्हा वदवून घेण्यात काहीही अर्थ नाही. जमा व खर्चाच्या मुद्यावर सविस्तर तपशीलवार चर्चा व्हावी व सर्वांना चर्चा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.७ मार्चला सभा : अर्थसंकल्पावर ५ ते ७ मार्चपर्यंत तीन दिवस विशेष सभेचे आयोजन केले होते. यामधील पहिला दिवस व्यर्थ गेला असून ६ तारखेला सभा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७ मार्चला सभा होणार असून एक दिवसात जमा व खर्चावर चर्चा होणार की चर्चेचे दिवस वाढविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका