शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये अग्निसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:18 IST

तुर्भे येथे सुमारे ७२ हेक्टर जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : आशिया खंडातली सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेले एपीएमसी मार्केट आगीच्या भक्षस्थानी सापडण्याच्या स्थितीमध्ये आहे. बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये सतत आगीच्या घटना घडत असतानाही अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, एखादी छोटी आग वेळीच आटोक्यात न आल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते. 

तुर्भे येथे सुमारे ७२ हेक्टर जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे. त्यात कांदा बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला व फळ या पाच मार्केटचा समावेश आहे. या प्रत्येक मार्केटमध्ये किमान सहा हजार व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय प्रत्येक मार्केटमध्ये निर्यात भवन व मध्यवर्ती सुविधा केंद्रे आहेत. यामुळे प्रतिदिन त्या ठिकाणी एक लाखाहून अधिक नागरिक व व्यापारी भेट देत असतात. तर हजारोंच्या संख्येने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र येथे  अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे  मार्केट आवारात आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. 

एपीएमसी आवारातील बहुतांश गाळ्यांमध्ये पोटमाळे तयार करून मालाचा साठा केला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यांतच छोटे कारखाने सुरू केले आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास काही क्षणांत ती परिसरातील इतरही गाळे खाक करू शकते. परंतु बाजार समितीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा नसल्याने महापालिकेच्या वाशी येथील अग्निशमन दलाला बचावकार्यासाठी जावे लागते. 

तसेच, अनेकदा एपीएमसी आवारातील पार्किंगने व्यापलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत अग्निशमन दलाच्या गाड्यांना जावे लागते. एखाद्या वेळी बचावकार्यास विलंब झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गाळ्यावर तसेच मार्केटमध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने एपीएमसी प्रशासनाला केल्या आहेत. पालिकेच्या या प्रत्येक सूचनेला केराची टोपली दाखवून अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी आग लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई