शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये अग्निसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:18 IST

तुर्भे येथे सुमारे ७२ हेक्टर जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : आशिया खंडातली सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेले एपीएमसी मार्केट आगीच्या भक्षस्थानी सापडण्याच्या स्थितीमध्ये आहे. बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये सतत आगीच्या घटना घडत असतानाही अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, एखादी छोटी आग वेळीच आटोक्यात न आल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते. 

तुर्भे येथे सुमारे ७२ हेक्टर जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे. त्यात कांदा बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला व फळ या पाच मार्केटचा समावेश आहे. या प्रत्येक मार्केटमध्ये किमान सहा हजार व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय प्रत्येक मार्केटमध्ये निर्यात भवन व मध्यवर्ती सुविधा केंद्रे आहेत. यामुळे प्रतिदिन त्या ठिकाणी एक लाखाहून अधिक नागरिक व व्यापारी भेट देत असतात. तर हजारोंच्या संख्येने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र येथे  अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे  मार्केट आवारात आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. 

एपीएमसी आवारातील बहुतांश गाळ्यांमध्ये पोटमाळे तयार करून मालाचा साठा केला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यांतच छोटे कारखाने सुरू केले आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास काही क्षणांत ती परिसरातील इतरही गाळे खाक करू शकते. परंतु बाजार समितीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा नसल्याने महापालिकेच्या वाशी येथील अग्निशमन दलाला बचावकार्यासाठी जावे लागते. 

तसेच, अनेकदा एपीएमसी आवारातील पार्किंगने व्यापलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत अग्निशमन दलाच्या गाड्यांना जावे लागते. एखाद्या वेळी बचावकार्यास विलंब झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गाळ्यावर तसेच मार्केटमध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने एपीएमसी प्रशासनाला केल्या आहेत. पालिकेच्या या प्रत्येक सूचनेला केराची टोपली दाखवून अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी आग लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई