शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:44 IST

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

नवी मुंबई : महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची सत्ता कायम राहणार की, शिवसेना भगवा फडकविणार, याविषयी उत्सुकता शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. डॉ. जयाजी नाथ, जे. डी. सुतार, विनोद म्हात्रे यांची नावे आघाडीवर आहेत; परंतु गणेश नाईक चर्चेतील नावांना बगल देऊन आयत्या वेळी नवीन चेहरा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामध्ये सलुजा सुतार यांचे नाव आघाडीवर आहे.महापौरपदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने दावा केला असून, उपमहापौरपदासाठी काँगे्रसच्या वतीने अर्ज दाखल केला जाणार आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचे नाव निश्चीत समजले जात आहे; परंतु शिवसेनेच्या वतीने काँगे्रसला महापौरपद देण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे नक्की काय होणार? हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांची मते फोडण्याची रणनीती आखली आहे. दगाफटका बसू नये, यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटीमहापालिकेची सत्ता टिकविण्यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक स्वत: लक्ष देत आहेत.राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. काँगे्रसबरोबर आघाडी टिकविण्यासाठीही व अपक्षांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडून काँगे्रस व अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी लागली असून नक्की बाजी कोण मारणार, हे ९ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.भाजपाच्या भूमिकेकडे लक्षसर्वांचे लक्ष शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रससह अपक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे. भाजपाच्या सहा नगरसेवकांना महत्त्व दिले जात असून, त्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई