शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 24, 2023 19:19 IST

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी संतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांकडे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. यासाठी दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. 

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या शासकीय सोहळ्याला गालबोट लागले असून घडलेल्या दुर्घटनेला शासनाला जबाबदार धरले जात आहे. त्यानुसार हि दुर्घटना मानवनिर्मित असल्याने आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याची केली आहे. या मागणीसाठी दानवे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची देखील भेट घेतली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, द्वारकानाथ भोईर, बबन पाटील आदी उपस्थित होते. 

राज्यात तापमान वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र करून त्यांच्या जीवाशी खेळ झालेला आहे. तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जमणाऱ्या नागरिकांना मात्र मंडपाविना उन्हात बसवून आवश्यक सुविधा देखील पुरवल्या नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.