शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 24, 2023 19:19 IST

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी संतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांकडे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. यासाठी दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. 

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या शासकीय सोहळ्याला गालबोट लागले असून घडलेल्या दुर्घटनेला शासनाला जबाबदार धरले जात आहे. त्यानुसार हि दुर्घटना मानवनिर्मित असल्याने आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याची केली आहे. या मागणीसाठी दानवे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची देखील भेट घेतली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, द्वारकानाथ भोईर, बबन पाटील आदी उपस्थित होते. 

राज्यात तापमान वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र करून त्यांच्या जीवाशी खेळ झालेला आहे. तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जमणाऱ्या नागरिकांना मात्र मंडपाविना उन्हात बसवून आवश्यक सुविधा देखील पुरवल्या नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.