शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

By नामदेव मोरे | Updated: August 9, 2023 17:54 IST

रुग्णालयांमधील गर्दी वाढली : सर्दी, खोकला तापाने नवी मुंबईकर त्रस्त.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पावसाचे प्रमाण कमी होताच साथीच्या अजाराने उचल खाल्ली आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. खासगी व महानगरपालिका रुग्णालयामधील रांगा वाढल्या आहेत. महानगरपालिकेचे वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयही फुल्ल झाले आहे. अनेक कुटुंबामधील एकापेक्षा जास्त सदस्य आजारी पडले असून प्रत्येकाने प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची रांग वाढत आहे. प्रतिदिन दीड हजार पेक्षा जास्त रुग्ण ओपीडीमध्ये येत आहेत. यामध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आंतररुग्ण विभागात दाखल होणारांची संख्याही वाढली असून अनेकवेळा बेड फुल्ल होऊ लागले आहेत. नेरूळ व ऐरोली रुग्णालयामध्येही अशीच स्थिती आहे. शहरातील खासगी रुग्णालये, छोटे दवाखाने येथील रुग्ण संख्येमध्येही २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. संशयीत डेंग्यू, मलेरिया, निमोनियाचे रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. अनेकांना उपचारासाठी एक ते दोन तासही वाट पाहावी लागत आहे.

साथीचे अजार वाढू नये यासाठी महानगरपालिकेने विशेष उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आरोग्य शिबिरे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू व मलेरियाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याचे वास्तव्य असलेल्या परिसरातही सर्वेक्षण केले जात आहे. मनपा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर व आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांनीही केल्या आहेत.रुग्णालयात रांगा

महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी सकाळी रांगा लागत आहेत. प्रत्येक ओपीडीच्या बाहेरही उपचारासाठी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयामध्येही अशीच स्थिती आहे.कोणाचे आईवडील तर कोणाचा मुलगा आजारी

प्रत्येक घरातील कोणाचे आईवडिल तर कोणाची मुले आजारी आहेत. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबच सर्दी, खोकला, तापाने त्रस्त आहेत. आयसीयूमधील रुग्णांची संख्याही वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये आयसीयूच्या बाहेर नातेवाईक चिंतेमध्ये असल्याचे चित्र आहे.सामान्यांना महानगरपालिकेचा आधार

शहरातील सर्वसामान्य रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांचाच आधार आहे. मोफत उपचार होत असल्यामुळे वाशी, नेरूळ, ऐरोली रुग्णालयात उपचारासाठी रांगा लागत आहेत. महानगरपालिकेने रुग्णालयामध्ये रुग्ण व नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध केली आहे. रुग्णालयातील स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल