शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नवी मुंबईमध्ये निर्माल्यातून खतनिर्मिती, २३ टन निर्माल्य संकलित

By नामदेव मोरे | Updated: September 6, 2022 18:32 IST

वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा, खताचा उद्यानांसाठी होणार उपयोग

नवी मुंबई : गणेशोत्सवात संकलीत होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. निर्माल्य वाहतुकीसाठी ४६ वाहनांची सोय केली आहे. आतापर्यंत २३ टन निर्माल्य संकलीत झाले असून आनंतचतुर्थीपर्यंत हे प्रमाण ५० टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खताचा उपयोग महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मनपा क्षेत्रात २२ नैसर्गिक तलावांबरोबर १३४ कृत्रीम तलावांची निर्मीती केली आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी निर्माल्य, फळे व इतर साहित्य तलावामध्ये टाकू नये असे आवाहन केले आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही भावीकांना सुचना दिल्या जात आहेत. निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचाही निर्यण घेतला आहे निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी त्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र वाहतूक व्यवस्था केली आहे. ४६ वाहनांच्या माध्यमातून निर्माल्य तुर्भेमधील कचरा भुमीवर नेले जात आहे. तेथे त्यामूधन खतनिर्मीती केली जात आहे.

गौरी विसर्जनापर्यंत पहिल्या सहा दिवसात तब्बल २३ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. अनंत चतुर्थीपर्यंत ५० टन पेक्षा जास्त निर्माल्य संकलीत होईल असा अंदाज आहे. निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा उद्यानांसाठी व इतर ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे, तलावांमधील प्रदुषण कमी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

स्वयंसेवी संस्थांचाही आधारमहानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे. वाशी, कोपरखैरणे व नेरूळ मध्ये स्वयंसेवी संस्थांनी विसर्जन स्थळावरच कंपोस्ट पिट तयार केले असून त्याच ठिकाणी निर्माल्यातून खतनिर्मीती केली जात आहे.

विभागनिहाय निर्माल्य वाहतुकीसाठी व्यवस्था

विभाग - वाहनांची संख्या

बेलापूर - ६

नेरूळ - ७

तुर्भे - ६

वाशी - ७

कोपरखैरणे - ४

घणसोली - ६

ऐरोली - ६

दिघा - ४

नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. निर्माल्यातून खत निर्मिती करून त्याचा उपयोग उद्यान व इतर ठिकाणी केला जाणार आहे. गौरी विसर्जनापर्यंत २३ टन निर्माल्य संकलित झाले आहे.बाबासाहेब राजळे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई