शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये निर्माल्यातून खतनिर्मिती, २३ टन निर्माल्य संकलित

By नामदेव मोरे | Updated: September 6, 2022 18:32 IST

वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा, खताचा उद्यानांसाठी होणार उपयोग

नवी मुंबई : गणेशोत्सवात संकलीत होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. निर्माल्य वाहतुकीसाठी ४६ वाहनांची सोय केली आहे. आतापर्यंत २३ टन निर्माल्य संकलीत झाले असून आनंतचतुर्थीपर्यंत हे प्रमाण ५० टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खताचा उपयोग महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मनपा क्षेत्रात २२ नैसर्गिक तलावांबरोबर १३४ कृत्रीम तलावांची निर्मीती केली आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी निर्माल्य, फळे व इतर साहित्य तलावामध्ये टाकू नये असे आवाहन केले आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही भावीकांना सुचना दिल्या जात आहेत. निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचाही निर्यण घेतला आहे निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी त्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र वाहतूक व्यवस्था केली आहे. ४६ वाहनांच्या माध्यमातून निर्माल्य तुर्भेमधील कचरा भुमीवर नेले जात आहे. तेथे त्यामूधन खतनिर्मीती केली जात आहे.

गौरी विसर्जनापर्यंत पहिल्या सहा दिवसात तब्बल २३ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. अनंत चतुर्थीपर्यंत ५० टन पेक्षा जास्त निर्माल्य संकलीत होईल असा अंदाज आहे. निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा उद्यानांसाठी व इतर ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे, तलावांमधील प्रदुषण कमी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

स्वयंसेवी संस्थांचाही आधारमहानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे. वाशी, कोपरखैरणे व नेरूळ मध्ये स्वयंसेवी संस्थांनी विसर्जन स्थळावरच कंपोस्ट पिट तयार केले असून त्याच ठिकाणी निर्माल्यातून खतनिर्मीती केली जात आहे.

विभागनिहाय निर्माल्य वाहतुकीसाठी व्यवस्था

विभाग - वाहनांची संख्या

बेलापूर - ६

नेरूळ - ७

तुर्भे - ६

वाशी - ७

कोपरखैरणे - ४

घणसोली - ६

ऐरोली - ६

दिघा - ४

नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. निर्माल्यातून खत निर्मिती करून त्याचा उपयोग उद्यान व इतर ठिकाणी केला जाणार आहे. गौरी विसर्जनापर्यंत २३ टन निर्माल्य संकलित झाले आहे.बाबासाहेब राजळे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई