शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नवी मुंबईमध्ये निर्माल्यातून खतनिर्मिती, २३ टन निर्माल्य संकलित

By नामदेव मोरे | Updated: September 6, 2022 18:32 IST

वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा, खताचा उद्यानांसाठी होणार उपयोग

नवी मुंबई : गणेशोत्सवात संकलीत होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. निर्माल्य वाहतुकीसाठी ४६ वाहनांची सोय केली आहे. आतापर्यंत २३ टन निर्माल्य संकलीत झाले असून आनंतचतुर्थीपर्यंत हे प्रमाण ५० टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खताचा उपयोग महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मनपा क्षेत्रात २२ नैसर्गिक तलावांबरोबर १३४ कृत्रीम तलावांची निर्मीती केली आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी निर्माल्य, फळे व इतर साहित्य तलावामध्ये टाकू नये असे आवाहन केले आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही भावीकांना सुचना दिल्या जात आहेत. निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचाही निर्यण घेतला आहे निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी त्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र वाहतूक व्यवस्था केली आहे. ४६ वाहनांच्या माध्यमातून निर्माल्य तुर्भेमधील कचरा भुमीवर नेले जात आहे. तेथे त्यामूधन खतनिर्मीती केली जात आहे.

गौरी विसर्जनापर्यंत पहिल्या सहा दिवसात तब्बल २३ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. अनंत चतुर्थीपर्यंत ५० टन पेक्षा जास्त निर्माल्य संकलीत होईल असा अंदाज आहे. निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा उद्यानांसाठी व इतर ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे, तलावांमधील प्रदुषण कमी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

स्वयंसेवी संस्थांचाही आधारमहानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे. वाशी, कोपरखैरणे व नेरूळ मध्ये स्वयंसेवी संस्थांनी विसर्जन स्थळावरच कंपोस्ट पिट तयार केले असून त्याच ठिकाणी निर्माल्यातून खतनिर्मीती केली जात आहे.

विभागनिहाय निर्माल्य वाहतुकीसाठी व्यवस्था

विभाग - वाहनांची संख्या

बेलापूर - ६

नेरूळ - ७

तुर्भे - ६

वाशी - ७

कोपरखैरणे - ४

घणसोली - ६

ऐरोली - ६

दिघा - ४

नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. निर्माल्यातून खत निर्मिती करून त्याचा उपयोग उद्यान व इतर ठिकाणी केला जाणार आहे. गौरी विसर्जनापर्यंत २३ टन निर्माल्य संकलित झाले आहे.बाबासाहेब राजळे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई