शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

खोक्यांमुळे आग लागण्याची भीती

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या व सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यामुळे मार्केटला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला की मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त होते. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय कामगार, अनधिकृत खोके विक्रेते बिनधास्तपणे येथे वावरत असतात. रोज तब्बल ४०० ते ४५0 वाहनांमधून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. या आंब्यांच्या पॅकिंगसाठी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लाकडाची खोकी तयार करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. १० ते १५ फूट उंच खोक्यांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मार्केटमधील जागा कमी पडू लागल्यामुळे आता तुर्भे ते सीडब्ल्यूसी गोडावूनकडे जाणाऱ्या रोडवरही खोकी ठेवली जात आहेत. मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश परप्रांतीय कामगार धूम्रपान करतात. विड्या व सिगारेट ओढून ती तेथील गवत व लाकडावरच टाकले जाते. यामुळे आग लागून पूर्ण मार्केट जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातवरून आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येथे हजारो कामगार काम करत आहेत. दिवाळीत मसाला मार्केटमध्ये आग लागली होती. त्याप्रमाणे फळ बाजारामध्येही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून मुंबई एपीएमसीची ओळख आहे. परंतु या मार्केटमध्ये कुठेच आग विझविण्याची यंत्रणा नाही. फळ मार्केटमध्ये आंबा हंगामामध्ये आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासही जागा नाही. मार्केटमध्ये सर्वत्र गवताचे व खोक्यांचे ढिगारे असल्याने पूर्ण मार्केट जळून खाक होवू शकते. अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला वारंवार नोटीस दिली आहे. परंतु व्यापारी व प्रशासन सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचेही अभय खोके विक्रेत्यांनी फळ मार्केटच्या बाहेर रोडवरही दुकाने थाटली आहेत. दोन मार्गिका विक्रेत्यांनी अडविल्या असून वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करत नसल्याने पालिकेच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.