शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खोक्यांमुळे आग लागण्याची भीती

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या व सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यामुळे मार्केटला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला की मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त होते. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय कामगार, अनधिकृत खोके विक्रेते बिनधास्तपणे येथे वावरत असतात. रोज तब्बल ४०० ते ४५0 वाहनांमधून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. या आंब्यांच्या पॅकिंगसाठी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लाकडाची खोकी तयार करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. १० ते १५ फूट उंच खोक्यांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मार्केटमधील जागा कमी पडू लागल्यामुळे आता तुर्भे ते सीडब्ल्यूसी गोडावूनकडे जाणाऱ्या रोडवरही खोकी ठेवली जात आहेत. मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश परप्रांतीय कामगार धूम्रपान करतात. विड्या व सिगारेट ओढून ती तेथील गवत व लाकडावरच टाकले जाते. यामुळे आग लागून पूर्ण मार्केट जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातवरून आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येथे हजारो कामगार काम करत आहेत. दिवाळीत मसाला मार्केटमध्ये आग लागली होती. त्याप्रमाणे फळ बाजारामध्येही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून मुंबई एपीएमसीची ओळख आहे. परंतु या मार्केटमध्ये कुठेच आग विझविण्याची यंत्रणा नाही. फळ मार्केटमध्ये आंबा हंगामामध्ये आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासही जागा नाही. मार्केटमध्ये सर्वत्र गवताचे व खोक्यांचे ढिगारे असल्याने पूर्ण मार्केट जळून खाक होवू शकते. अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला वारंवार नोटीस दिली आहे. परंतु व्यापारी व प्रशासन सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचेही अभय खोके विक्रेत्यांनी फळ मार्केटच्या बाहेर रोडवरही दुकाने थाटली आहेत. दोन मार्गिका विक्रेत्यांनी अडविल्या असून वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करत नसल्याने पालिकेच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.