शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

खोक्यांमुळे आग लागण्याची भीती

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या व सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यामुळे मार्केटला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला की मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त होते. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय कामगार, अनधिकृत खोके विक्रेते बिनधास्तपणे येथे वावरत असतात. रोज तब्बल ४०० ते ४५0 वाहनांमधून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. या आंब्यांच्या पॅकिंगसाठी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लाकडाची खोकी तयार करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. १० ते १५ फूट उंच खोक्यांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मार्केटमधील जागा कमी पडू लागल्यामुळे आता तुर्भे ते सीडब्ल्यूसी गोडावूनकडे जाणाऱ्या रोडवरही खोकी ठेवली जात आहेत. मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश परप्रांतीय कामगार धूम्रपान करतात. विड्या व सिगारेट ओढून ती तेथील गवत व लाकडावरच टाकले जाते. यामुळे आग लागून पूर्ण मार्केट जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातवरून आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येथे हजारो कामगार काम करत आहेत. दिवाळीत मसाला मार्केटमध्ये आग लागली होती. त्याप्रमाणे फळ बाजारामध्येही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून मुंबई एपीएमसीची ओळख आहे. परंतु या मार्केटमध्ये कुठेच आग विझविण्याची यंत्रणा नाही. फळ मार्केटमध्ये आंबा हंगामामध्ये आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासही जागा नाही. मार्केटमध्ये सर्वत्र गवताचे व खोक्यांचे ढिगारे असल्याने पूर्ण मार्केट जळून खाक होवू शकते. अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला वारंवार नोटीस दिली आहे. परंतु व्यापारी व प्रशासन सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचेही अभय खोके विक्रेत्यांनी फळ मार्केटच्या बाहेर रोडवरही दुकाने थाटली आहेत. दोन मार्गिका विक्रेत्यांनी अडविल्या असून वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करत नसल्याने पालिकेच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.