शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जीवघेणे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ

प्राची सोनवणे, नवी मुंबई

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असून, वाढत्या गर्दीमुळे गाडीतून पडून जीव गमवावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही लोकल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकरिता मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्बर मार्गावरील गोवंडी-मानखुर्द ते सीवूड्स तसेच ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली ते सानपाडा-जुईनगर या रेल्वेमार्गाचा समावेश होतो. हार्बर मार्गासह ठाणे-वाशी- पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्ग नवी मुंबईशी जोडला गेल्याने या दोन्ही रेल्वेमार्गांवरून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता यामध्ये गाड्यांची संख्या अजूनही वाढविली नसल्याने या मर्गावरील प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळेही अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून मृत पावणाऱ्यांची तसेच जखमींची संख्याही वाढली आहे. या वर्षभरात १९३ प्रवासी जखमी झाले असून, निव्वळ जखमी झालेल्यांची संख्या एकूण १५७ आहे. याध्ये २५ प्रवासी रूळ ओलांडताना जखमी झाले आहेत, तर ९३ प्रवासी लोकलच्या डब्यामधून पडून जखमी झाले आहेत. ४९ प्रवासी अन्य कारणाने जखमी झाल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम मरभळ यांनी दिली. या मार्गावर सर्वाधिक अपघात गोवंडी-मानखुर्द, सानपाडा-तुर्भे, नेरूळ, घणसोली आदी रेल्वे स्थानकांजवळ रूळ ओलांडताना झाल्याचे आणि गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडला जातो, किमान त्या ठिकाणी तरी रेल्वे अथवा सिडको व्यवस्थापनाने पादचारी पूल उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. तुर्भे नाका, सानपाडा दत्त मंदिर, बेलापूर खिंड, एरोली या परिसरातही रेल्वे अपघातांची संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून जनजागृती केली जाते. वर्षभरात १०९ प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावला आहे. ७२ प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना आणि ११ प्रवाशांना गाडीतून पडून जीव गमवावा लागला आहे. - नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, वाशी