शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

जीवघेणे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ

प्राची सोनवणे, नवी मुंबई

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असून, वाढत्या गर्दीमुळे गाडीतून पडून जीव गमवावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही लोकल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकरिता मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्बर मार्गावरील गोवंडी-मानखुर्द ते सीवूड्स तसेच ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली ते सानपाडा-जुईनगर या रेल्वेमार्गाचा समावेश होतो. हार्बर मार्गासह ठाणे-वाशी- पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्ग नवी मुंबईशी जोडला गेल्याने या दोन्ही रेल्वेमार्गांवरून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता यामध्ये गाड्यांची संख्या अजूनही वाढविली नसल्याने या मर्गावरील प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळेही अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून मृत पावणाऱ्यांची तसेच जखमींची संख्याही वाढली आहे. या वर्षभरात १९३ प्रवासी जखमी झाले असून, निव्वळ जखमी झालेल्यांची संख्या एकूण १५७ आहे. याध्ये २५ प्रवासी रूळ ओलांडताना जखमी झाले आहेत, तर ९३ प्रवासी लोकलच्या डब्यामधून पडून जखमी झाले आहेत. ४९ प्रवासी अन्य कारणाने जखमी झाल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम मरभळ यांनी दिली. या मार्गावर सर्वाधिक अपघात गोवंडी-मानखुर्द, सानपाडा-तुर्भे, नेरूळ, घणसोली आदी रेल्वे स्थानकांजवळ रूळ ओलांडताना झाल्याचे आणि गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडला जातो, किमान त्या ठिकाणी तरी रेल्वे अथवा सिडको व्यवस्थापनाने पादचारी पूल उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. तुर्भे नाका, सानपाडा दत्त मंदिर, बेलापूर खिंड, एरोली या परिसरातही रेल्वे अपघातांची संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून जनजागृती केली जाते. वर्षभरात १०९ प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावला आहे. ७२ प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना आणि ११ प्रवाशांना गाडीतून पडून जीव गमवावा लागला आहे. - नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, वाशी