शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

जीवघेणे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ

प्राची सोनवणे, नवी मुंबई

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असून, वाढत्या गर्दीमुळे गाडीतून पडून जीव गमवावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही लोकल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकरिता मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्बर मार्गावरील गोवंडी-मानखुर्द ते सीवूड्स तसेच ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली ते सानपाडा-जुईनगर या रेल्वेमार्गाचा समावेश होतो. हार्बर मार्गासह ठाणे-वाशी- पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्ग नवी मुंबईशी जोडला गेल्याने या दोन्ही रेल्वेमार्गांवरून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता यामध्ये गाड्यांची संख्या अजूनही वाढविली नसल्याने या मर्गावरील प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळेही अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून मृत पावणाऱ्यांची तसेच जखमींची संख्याही वाढली आहे. या वर्षभरात १९३ प्रवासी जखमी झाले असून, निव्वळ जखमी झालेल्यांची संख्या एकूण १५७ आहे. याध्ये २५ प्रवासी रूळ ओलांडताना जखमी झाले आहेत, तर ९३ प्रवासी लोकलच्या डब्यामधून पडून जखमी झाले आहेत. ४९ प्रवासी अन्य कारणाने जखमी झाल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम मरभळ यांनी दिली. या मार्गावर सर्वाधिक अपघात गोवंडी-मानखुर्द, सानपाडा-तुर्भे, नेरूळ, घणसोली आदी रेल्वे स्थानकांजवळ रूळ ओलांडताना झाल्याचे आणि गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडला जातो, किमान त्या ठिकाणी तरी रेल्वे अथवा सिडको व्यवस्थापनाने पादचारी पूल उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. तुर्भे नाका, सानपाडा दत्त मंदिर, बेलापूर खिंड, एरोली या परिसरातही रेल्वे अपघातांची संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून जनजागृती केली जाते. वर्षभरात १०९ प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावला आहे. ७२ प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना आणि ११ प्रवाशांना गाडीतून पडून जीव गमवावा लागला आहे. - नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, वाशी