शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ

प्राची सोनवणे, नवी मुंबई

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असून, वाढत्या गर्दीमुळे गाडीतून पडून जीव गमवावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही लोकल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकरिता मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्बर मार्गावरील गोवंडी-मानखुर्द ते सीवूड्स तसेच ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली ते सानपाडा-जुईनगर या रेल्वेमार्गाचा समावेश होतो. हार्बर मार्गासह ठाणे-वाशी- पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्ग नवी मुंबईशी जोडला गेल्याने या दोन्ही रेल्वेमार्गांवरून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता यामध्ये गाड्यांची संख्या अजूनही वाढविली नसल्याने या मर्गावरील प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळेही अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून मृत पावणाऱ्यांची तसेच जखमींची संख्याही वाढली आहे. या वर्षभरात १९३ प्रवासी जखमी झाले असून, निव्वळ जखमी झालेल्यांची संख्या एकूण १५७ आहे. याध्ये २५ प्रवासी रूळ ओलांडताना जखमी झाले आहेत, तर ९३ प्रवासी लोकलच्या डब्यामधून पडून जखमी झाले आहेत. ४९ प्रवासी अन्य कारणाने जखमी झाल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम मरभळ यांनी दिली. या मार्गावर सर्वाधिक अपघात गोवंडी-मानखुर्द, सानपाडा-तुर्भे, नेरूळ, घणसोली आदी रेल्वे स्थानकांजवळ रूळ ओलांडताना झाल्याचे आणि गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडला जातो, किमान त्या ठिकाणी तरी रेल्वे अथवा सिडको व्यवस्थापनाने पादचारी पूल उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. तुर्भे नाका, सानपाडा दत्त मंदिर, बेलापूर खिंड, एरोली या परिसरातही रेल्वे अपघातांची संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून जनजागृती केली जाते. वर्षभरात १०९ प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावला आहे. ७२ प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना आणि ११ प्रवाशांना गाडीतून पडून जीव गमवावा लागला आहे. - नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, वाशी