शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'नैना'बाबत शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:13 IST

खासदार श्रीरंग बारणे

नवीन पनवेल : नैनासंदर्भात शेतकऱ्यांची लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ते विहिघर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या सभेत  बोलत होते. ८ वर्षांपासून नैनाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे.  शेतकऱ्याला नैनाकडून जमिनीचे करोडो रुपये भरण्याच्या नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत. शनिवारी विहिघर येथील सभेत शेतकऱ्यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १०० टक्के न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांची घरे जाणार नाहीत व विरार-अलिबाग कॉरिडॉर रस्त्यात घरांचे नुकसान होणार नाही, असे सांगितले. सिडकोने जागा घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायला हवे तर इथे शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितले जात असल्याची व्यथा खुद्द बारणे यांनी मांडली. २०१३ पासून केवळ जमिनीला अटकाव करून ठेवले जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. येथील भूमिपुत्र मोठ्या अडचणीत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना न्याय देतील आणि शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांना दिले. या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सेनेच्या माध्यमातून सिडकोकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडल्याचे सांगितले. या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, नामदेव फडके, रामदास शेवाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMember of parliamentखासदार