शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची दहशत, निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा मिळेना, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 04:02 IST

देशातील प्रमुख महानगरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे. प्रत्येक प्रभागामधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत.

- नामदेव मोरे।नवी मुंबई : देशातील प्रमुख महानगरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे. प्रत्येक प्रभागामधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. विशेषत: रात्री रोडवर त्यांचेच राज्य असून पादचाºयांसह मोटारसायकलस्वारांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे मोटारसायकलचे अपघात होण्याची संख्याही वाढत आहे. महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीप्रमाणे २०१६ - १७ या वर्षामध्ये तब्बल १४,५४६ नागरिकांना श्वानदंश झाला आहे. महिन्याला हे प्रमाण १२१२ एवढे असून रोज सरासरी ३९ नागरिकांना श्वानदंश झाल्याची घटना घडली आहे. रात्री रोडवून प्रवास करण्याचीही भीती वाटू लागली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्येही वारंवार याविषयी आवाज उठविला जात आहे. नागरिकांमधील रोषही वाढू लागला आहे. पालिकेच्यावतीने श्वान नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. डम्पिंग ग्राउंडवर निर्बीजीकरण केंद्र सुरू केले असून महिन्याला ४५० ते ५०० निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होत आहेत. परंतु कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेवून हे प्रमाण १००० ते १२०० करणे आवश्यक आहे.महापालिका प्रशासन श्वानदंशावरील लस व निर्बीजीकरणासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करत आहेत. परंतु अद्ययावत व प्रशस्त निर्बीजीकरण केंद्र उभारण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पूर्वी पामबीच रोडवर कोपरीगावाजवळ श्वाननियंत्रण केंद्र होते. ती इमारत धोकादायक झाल्यानंतर केंद्र डम्पिंग ग्राउंडवर हलविण्यात आले आहे. पालिकेने तुर्भे उड्डाणपुलाखाली व नंतर सानपाडामध्ये नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र होवू शकले नाही. भविष्यात ही समस्या कायमस्वरूपी सोडवायची असेल तर महिन्याला सरासरी १५०० शस्त्रक्रिया करता येतील एवढ्या क्षमतेचे श्वाननियंत्रण केंद्र विनाविलंब उभारण्याची आवश्यकता असून लोकप्रतिनिधी व नागरिक याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आयुक्तांना शहरवासीयांचे साकडेश्वाननियंत्रण मोहीम यशस्वी करणारी देशातील एकमेव महापालिका होण्याचा बहुमान नवी मुंबईला मिळू शकतो. शंभर टक्के निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून भटक्या कुत्र्यांचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात येवू शकते. परंतु त्यासाठी महिन्याला १५०० शस्त्रक्रिया करता येतील एवढे मोठे केंद्र उभारण्याची गरज आहे.दहा वर्षांपासून त्यासाठी जागा शोधण्यात येत असून नागरिक व नगरसेवकांच्या विरोधामुळे दोन ठिकाणचा प्रस्ताव रद्द करावा लागला आहे. आता विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनाच नागरिक साकडे घालणार असून त्यांच्या कार्यकाळात पशुवैद्यकीय दवाखाना व श्वाननियंत्रण केंद्र उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पनवेलमध्येही स्थिती गंभीरनवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये श्वानदंश झाल्यास महापालिका मोफत उपचार मिळवून देत आहे. याशिवाय निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी एक केंद्र सुरू केले आहे. परंतु पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये श्वानदंशावरील उपचार व निर्बीजीकरण केंद्राकडेही पूर्णपणे दुर्लक्ष होवू लागले आहे.- स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. २०१५ - १६ मध्ये तब्बल १४,५४६ नागरिकांना श्वानदंश झाल्याची घटना घडली असून रोजचे सरासरी प्रमाण ३९ एवढे आहे. पालिकेच्या केंद्राला पुरेशी जागा नसल्याने अपेक्षित गतीने निर्बीजीकरण होत नाही. दहा वर्षांपासून श्वाननियंत्रण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले असून त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे.