शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी दिली बनावट माहिती, पाच हजार अर्जांना दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:57 IST

प्रशासनाकडून कारवाई : पाच हजार अर्जांना दाखविली केराची टोपली

आविष्कार देसाई।रायगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पास घेतल्याशिवाय सध्या कोणालाच प्रवास करता येत नाही. रायगड जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एक लाख २८ हजार ६४ ई-पास दिले आहेत. खोटी कारणे आणि बनावट माहिती भरून ई-पास घेण्याच्या तयारीत असणाऱ्या सुमारे पाच हजार अर्जांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

कोरोनामुळे नागरिकांना प्रवास करणे मुश्कील झाले आहे. अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणे ज्यांना खरोखरच गरजेचे आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने ई-पासची व्यवस्था केली आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून टोकन नंबर दिला जातो. त्यानंतर, संबंधिताला ई-पास देण्यात येतो. ई-पास मिळविण्यासाठी मुंबई, कांदिवली, घाटकोपर येथील अर्जदारांनी रायगड जिल्ह्यातील खोटे पत्ते दिल्याचे समोर आले आहे, तसेच यासाठी त्याच परिसरातील डॉक्टरांचे प्रमाणपत्रही जोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदरचे अर्जदार हे रायगड जिल्ह्यातील नसल्याचे स्पष्ट झाल्याने, रायगड जिल्हा प्रशासनाने असे सुमारे पाच हजार अर्ज बाद केले आहेत. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ही बाब लक्षात आल्यानेच त्यांना ई-पास दिले गेले नाहीत, असे नायब तहसीलदार यशवंत वैशंपायन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर गुजरात आणि राजस्थान राज्यात जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती. रायगड जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने सर्वसाधरणपणे या राज्यात मोठ्या संख्येने जात नाहीत. त्यामुळे या प्रकरणी खोलात जाऊन माहिती घेतल्यावर संबंधित अर्जदार हे पनवेल आयुक्तालय हद्दीतील असल्याचे समोर आले. त्यामुळे ते अर्ज त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाऊनच्या कालावधीत कामगार, मजुरांना आपापल्या गावी जाता यावे, यासाठी ई-पासची संकल्पना आखण्यात आली होती. आता मात्र, सर्रासपणे ई-पास देण्यात येत आहेत. ई-पासची गरज असलेल्या अर्जदारांच्या अर्जामध्ये डॉक्टरचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेडिकलचे कारण देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही अर्जदार तर नातेवाइकांच्या मृत्यूचे कारण देत असल्याचे दिसून येते.काही अर्जांमध्ये एकच संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यामुळे अशा अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.पास मिळण्यासाठी दिलेली कारणेपर जिल्ह्यात नातेवाईक अडकलेआहेत, हे कारण देणाºयांची संख्या सुमारे ५०-६० टक्केमेडिकलचे कारण देणारे सुमारे ३०-४० टक्केआजारपणाचे कारणे देणारे १०-१५ टक्केलग्न सोहळ्याचे कारण देणारे सुमारे ५ टक्केमृत्यूचे कारण देणारे सुमारे ५ टक्केमजेशीर किस्सा : कुत्र्याची तब्बेत बिघडली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईला न्यावे लागणार आहे., ई पाससाठी अशीही कारणे काहींनी अर्जात दिली आहेत.जिल्हाधिकाºयांकडून मनाईच्सातारा, अमरावती, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनी तर आमच्या जिल्ह्यात येणाºयांसाठी ई-पास देऊ नये, अशी विनंती केली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव पाहून अशी मागणी केली असण्याची शक्यता आहे.च्जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १ लाख २८ हजार ६४ ई-पास दिले आहेत, तर १ लाख ८६ हजार ४८८ अर्ज बाद केले आहेत. सदरची आकडेवारी ही ४ आॅगस्ट, २०२० पर्यंतची आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी