शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कारखान्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: May 31, 2016 03:21 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले

तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले असून डोंबिवलीप्रमाणे एखादी घटना घडल्यास फायर ब्रिगेडकडे यंत्रणा अपुरी असल्याने हानी होऊ शकते.तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या फायर ब्रिगेडच्या दलात ६००० लिटर व ४००० लिटर अशी दोनच वाहने असून याची क्षमता फारच कमी असल्याने एखाद्या ठिकाणी आग लागल्यास हे बंब काही मिनिटांतच रिकामे होतात व पुन्हा ती गाडी भरून आणण्यासाठी फार वेळ वाया जातो. तसेच खारघर, कळंबोली दलाकडून वेळ पडल्यास बंब मागवावे लागतात. तळोजा औद्योगिक अग्निशमन दलात असलेले अपुरे जवान व फायर ब्रिगेडच्या वाहनांमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत थरारक घडलेल्या ब्लास्टनंतर प्रशासन व यंत्रणा खडबडून जागी झाली, मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची सुरक्षा करणारी फायर ब्रिगेड सेवा बारगळली आहे. या ठिकाणी असलेले अग्निशमन अधिकारी गुंड यांनी अपुरे कर्मचारी असल्याने त्यांची व फायर वाहनांची या आधी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले. तळोजात फायर ब्रिगेडच्या ताफ्यात अवघ्या दोन गाड्या आहेत व त्यातील एक ६००० व एक४००० क्षमतेच्या आहेत. या दोन वाहनांची सुविधा अपुरी असून या परिसरासाठी १० हजार लिटरच्या पाच गाड्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तळोजा फायर ब्रिगेडकडे असलेल्या दोन गाड्यांपासून आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या समस्या उद्भवत आहेत.