शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:38 IST

पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे

वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे. पाण्याच्या भीषण टंचाईचा फटका ग्रामीण भागातील गावांना आणि आदिवासीपाड्यांना बसला आहे. त्यामुळे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांचाही समावेश आहे. संपूर्ण पनवेल महापालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु यापैकी फक्त १८० एमएलडी पाणी महापालिका क्षेत्राला मिळते. ग्रामीण भागाची मागणी २० एमएलडी असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. बोअरवेल किंवा डोंगराच्या पायथ्याची खोदलेल्या खड्ड्यातून आदिवासी बांधवांना पाणी भरावे लागत आहे. त्यातच विहिरी, खड्डे यामधील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे आदिवासी बांधव हतबल झाले आहेत. सिडको तसेच पनवेल महापालिकेचेही या आदिवासीपाड्याकडे सपशेल दुर्लक्ष होत चालले आहे. आमच्या यातना सांगाव्या तरी कोणाला, अशी भावना आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक-३मधील धामोळे आदिवासीवाडीला सर्वात जास्त पाण्याच्या यातना सोसाव्या लागत आहेत. एकीकडे भव्य असे गोल्फ कोर्स, २४ तास गवतावर पाण्याचे फवारे आणि दुसरीकडे दुष्काळ सदृश स्थिती अशी परिस्थिती धामोळे आदिवासीपाड्यात निर्माण झाली आहे. या ठिकाणी सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यामध्ये अनियमितता असल्यामुळे भरउन्हात येथील महिलांना पाण्यासाठी शहरभर भटकंती करावी लागत आहे. शहरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा झाल्यास ते सिडको व पालिकेवर मोर्चे काढतात; परंतु आम्ही हे करू शकत नाही, कारण आमचे हातावर पोट आहे. एक दिवस सुट्टी केली तरी घरच्या चुली पेटणार नाहीत, अशी खंत बाळाराम पारधी या युवकाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. खारघरमधील घोळवाडी आदिवासीवाडीतही हीच समस्या आहे. या वाडीतून मंजुळा कातकरी या नगरसेविका निवडून आल्या आहेत.ग्रामीण भागात पडघे गावाला या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने महिनाभरापूर्वी या ठिकाणी पाणीकपात केली असल्याने येथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नियमितता नसल्याने गावात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विष्णू जोशी यांनी व्यक्त केली आहे.या परिसरात टेंभोडे, वळवली या गावांतदेखील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील वार्घ्याची वाडी आदिवासीवाडीतही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे.५00पेक्षा जास्त बोअरवेल, विहीर निरुपयोगीपडघे, वळवली, टेंभोडे या परिसरात ५00पेक्षा अधिक बोअरवेल व विहिरी आहेत; परंतु तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे बोअरवेल व विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यातून उग्र वास येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. एकूणच या परिसरात असलेल्या पाचशेपेक्षा अधिक बोअरवेल आणि विहिरी निरुपयोगी ठरल्या आहेत.