शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:38 IST

पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे

वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे. पाण्याच्या भीषण टंचाईचा फटका ग्रामीण भागातील गावांना आणि आदिवासीपाड्यांना बसला आहे. त्यामुळे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांचाही समावेश आहे. संपूर्ण पनवेल महापालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु यापैकी फक्त १८० एमएलडी पाणी महापालिका क्षेत्राला मिळते. ग्रामीण भागाची मागणी २० एमएलडी असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. बोअरवेल किंवा डोंगराच्या पायथ्याची खोदलेल्या खड्ड्यातून आदिवासी बांधवांना पाणी भरावे लागत आहे. त्यातच विहिरी, खड्डे यामधील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे आदिवासी बांधव हतबल झाले आहेत. सिडको तसेच पनवेल महापालिकेचेही या आदिवासीपाड्याकडे सपशेल दुर्लक्ष होत चालले आहे. आमच्या यातना सांगाव्या तरी कोणाला, अशी भावना आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक-३मधील धामोळे आदिवासीवाडीला सर्वात जास्त पाण्याच्या यातना सोसाव्या लागत आहेत. एकीकडे भव्य असे गोल्फ कोर्स, २४ तास गवतावर पाण्याचे फवारे आणि दुसरीकडे दुष्काळ सदृश स्थिती अशी परिस्थिती धामोळे आदिवासीपाड्यात निर्माण झाली आहे. या ठिकाणी सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यामध्ये अनियमितता असल्यामुळे भरउन्हात येथील महिलांना पाण्यासाठी शहरभर भटकंती करावी लागत आहे. शहरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा झाल्यास ते सिडको व पालिकेवर मोर्चे काढतात; परंतु आम्ही हे करू शकत नाही, कारण आमचे हातावर पोट आहे. एक दिवस सुट्टी केली तरी घरच्या चुली पेटणार नाहीत, अशी खंत बाळाराम पारधी या युवकाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. खारघरमधील घोळवाडी आदिवासीवाडीतही हीच समस्या आहे. या वाडीतून मंजुळा कातकरी या नगरसेविका निवडून आल्या आहेत.ग्रामीण भागात पडघे गावाला या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने महिनाभरापूर्वी या ठिकाणी पाणीकपात केली असल्याने येथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नियमितता नसल्याने गावात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विष्णू जोशी यांनी व्यक्त केली आहे.या परिसरात टेंभोडे, वळवली या गावांतदेखील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील वार्घ्याची वाडी आदिवासीवाडीतही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे.५00पेक्षा जास्त बोअरवेल, विहीर निरुपयोगीपडघे, वळवली, टेंभोडे या परिसरात ५00पेक्षा अधिक बोअरवेल व विहिरी आहेत; परंतु तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे बोअरवेल व विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यातून उग्र वास येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. एकूणच या परिसरात असलेल्या पाचशेपेक्षा अधिक बोअरवेल आणि विहिरी निरुपयोगी ठरल्या आहेत.