शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

उरण विभागासाठी अतिरिक्त बस

By admin | Updated: December 8, 2015 01:00 IST

वाशी ते उरण या मार्गातील प्रवासी संख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

नवी मुंबई : वाशी ते उरण या मार्गातील प्रवासी संख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी विभागातून संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे. कोपरखैरणेतून उरणकडे जाणाऱ्या ३१ क्रमांकाच्या बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात जादा बसेस सोडल्या जाव्यात अशी मागणी एनएमएमटीकडे केली. संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान या एखादी बस जरी हुकली तरी प्रवाशांना तासभर बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. उरण उत्कर्ष समितीच्या मागणीची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. चालक, वाहक कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. उरण उत्कर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी याबाबत मागणी करुन एनएमएमटीच्या वतीने चांगल्या सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)