शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उरण विभागासाठी अतिरिक्त बस

By admin | Updated: December 8, 2015 01:00 IST

वाशी ते उरण या मार्गातील प्रवासी संख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

नवी मुंबई : वाशी ते उरण या मार्गातील प्रवासी संख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी विभागातून संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे. कोपरखैरणेतून उरणकडे जाणाऱ्या ३१ क्रमांकाच्या बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात जादा बसेस सोडल्या जाव्यात अशी मागणी एनएमएमटीकडे केली. संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान या एखादी बस जरी हुकली तरी प्रवाशांना तासभर बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. उरण उत्कर्ष समितीच्या मागणीची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. चालक, वाहक कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. उरण उत्कर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी याबाबत मागणी करुन एनएमएमटीच्या वतीने चांगल्या सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)