शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे नियमित करण्याच्या धोरणाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 02:57 IST

शहरातील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याच्या धोरणाला सर्वसाधारण सभेने एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याच्या धोरणाला सर्वसाधारण सभेने एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या धोरणातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. प्रकल्पग्रस्तांसाठी अटी कमी कराव्या, अशा सूचना केल्या.शासनाच्या नगरविकास विभागाने आॅक्टोबर २०१७ मध्ये अधिसूचना काढली होती. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ मध्ये सुधारणा करून कलम ५२ क नव्याने अंतर्भूत केले आहे. अनधिकृत बांधकामे प्रशमित संरचना म्हणून घोषित करावी, अशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. शासनाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीप्रमाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे प्रशमन आकारून नियमित करण्याबाबत शासनाच्या उक्त अधिसूचनेप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. यापूर्वी अर्ज मागविण्यासाठी ३१ आॅक्टोबरची मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ३० एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता.या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. आतापर्यंत किती अर्ज आले. किती बांधकामे नियमित केली, असा प्रश्न उपस्थित केला. या धोरणामधील अनेक अटी प्रकल्पग्रस्तांसाठी जाचक ठरत आहेत. अटींमुळे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने शासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून मार्ग काढावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आयुक्तांनी याविषयी माहिती देताना सांगितले की महापालिकेने धोरण मंजूर केल्यापासून ५२ जणांचे अर्ज आले असल्याची माहिती दिली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही नगररचना अधिकारी व आयुक्तांनी उत्तरे दिल्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.>शासनाने बांधकामे प्रशमित करण्याचा प्रस्ताव आणला तेव्हा गावांची वस्तुस्थिती पाहिली पाहिजे होती. गावांमध्ये रस्ता नसल्यामुळे बांधकाम परवानगी दिली जात नाही. वस्तुस्थिती प्रशासनाने शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी.- जयवंत सुतार,महापौर>गावठाणांमधील घरे नियमित केली पाहिजेत. डीसी रूलमध्ये गावठाण कसे बसविले जाणार याविषयी आयुक्तांनी माहिती द्यावी. ग्रामस्थांची घरे नियमित करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी.- द्वारकानाथ भोईर,गटनेते, शिवसेना