शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:31 IST

पालिकेचा निर्णय : १५ डिसेंबरपासून ११२ कोटींचा महसूल जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. सर्व मालमत्ताधारकांना लाभ घेता यावा यासाठी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांना रोजगार गमवावा लागला. उत्पन्नावरही परिणाम झाला. यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आला नाही. महापालिकेची थकबाकी वाढू लागली.  थकबाकी कमी करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. दंडाच्या  रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ फेब्रुवारीला अभय योजनेची मुदत संपल्यानंतर पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे. १५ मार्चपर्यंत मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरल्यानंतर पुढील ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. १६ ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेवर ५० टक्के सवलत राहणार आहे. महानगरपालिकेने अभय योजना जाहीर केल्यापासून १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख एवढी रक्कम जमा झाली आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपये सूट मिळाली आहे. यामुळे एकूण मनपाची १७२ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी कमी झाली आहे. आर्थिक वर्षात आतापर्यंत ४४०  कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनीही अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.