शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:06 IST

प्रदूषणाचा फटका : नद्यांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांची गरज

वैभव गायकरपनवेल : पनवेल परिसरातील नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे. नद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने विविध उपक्र म सुरू केले आहे. त्यासाठी हजारो कोटी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र पनवेलमधील नद्यांचे अस्तित्व टिकविण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. पनवेल तालुक्यातील कासाडी, गाढी, काळुंद्रे या नद्यांची अवस्था गंभीर झाली आहे. प्रदूषणामुळे नद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. घोट नदीसारख्या उपनद्या देखील प्रदूषणाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे नद्यांमधील वन्य व जीवसृष्टी धोक्यात आली आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा फटका आजूबाजूच्या वसाहतींना बसला आहे. पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बंद झाला आहे. प्रक्रि या न केलेले कारखान्यांतील सांडपाणी, हॉटेलसह जैविक कचरा, नदी तटावरील अतिक्रमणे आदीमुळे नद्यांचे पाणी दूषित होत आहे. तळोजा औद्योगिक विभागातून जाणारी कासाडी नदी आजमितीस सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. या नदीचे पाणी पूर्णपणे काळवंडले आहे . कारखान्यातील घातक रसायन मिश्रित पाणी या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीची घोट उपनदीसुध्दा प्रदूषित झाली आहे. या दोन्ही नदीच्या प्रदूषणामुळे या परिसरातील शेकडो वर्षांपासूनची गणेश विसर्जनाची परंपरा यावर्षी खंडित झाली.

तळोजामधील नदी प्रदूषणामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. या संदर्भात हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला उपाययोजना राबविण्याचे आदेश देखील दिले आहेत .पनवेल शहरातून जाणारी गाढी नदीची देखील हीच अवस्था आहे. पनवेल शहरासह सिडको वसाहतीमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी या नद्यांचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. परंतु प्रदूषणामुळे गुरांना देखील पाणी अपायकारक ठरत आहे. काळुंद्रे नदी प्रदूषणाने हिरवीगार झाली या ठिकाणी पार पडणारे धार्मिक विधी आता बंद झाले आहेत.तळोजामधील कासाडी नदी मधील प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे . म्हणून यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये धाव घेतली आहे . हरित लवादाने प्रदूषणा संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते . पुढील महिन्यात हा अहावल सादर केला जाणार आहे.- नगरसेवक अरविंद म्हात्रे,याचिकाकर्तेतळोजा आद्योगिक वसाहती मधील घोट व कासाडी नद्यांची अवस्था अतिशय बिकट आहे . प्रदूषणामुळे येथील नद्यामधील मासेमारी व्यवसाय नष्ट झाला आहे . विशेष म्हणजे यासंदर्भात वारंवार आवाज उठवून देखील संबंधित प्राधिकरणामार्फत या उपाययोजना होत नाही .- हरेश केणी,स्थानिक नगरसेवक 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई