शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 24, 2023 19:17 IST

जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मोरबे धरण पूर्ण भरताच रविवारी तीन माजी महापौरांनी त्याठिकाणी परस्पर जलपूजन उरकल्याचा प्रकार समोर आला. धरण शंभर टक्के भरल्याची आनंदाची बातमी प्रशासनाकडून प्रसिद्ध करताच राजकारण्यांनी त्याठिकाणी पूजेचा घाट घातला. दरम्यान त्यांच्यामार्फत झालेले जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याने शनिवारी रात्री अत्युच्च पातळी गाठली. दोन वर्षानंतर यंदा धरण क्षेत्रात झालेल्या पुरेशा पावसामुळे धरणातील पाण्याने उच्च पातळी गाठली आहे. यामुळे नवी मुंबईकरांना पुढील वर्षभर मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. नवी मुंबईकरांना दिलासा देणारी हि माहिती रविवारी सकाळी प्रशासनाकडून उघड करण्यात आली. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून त्याठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम केला जाणार होता. त्यापूर्वीच माजी महापौरांची फौज धरणावर धडकून त्यांनी परस्पर जलपूजन उरकल्याचा प्रकार दुपारी समोर आला. माजी महापौर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह इतर काहींनी धरणावर जाऊन तिथली पाहणी केली.

शिवाय सोबत नेलेल्या पंडित मार्फत त्याठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम देखील उरकून टाकला. मात्र हे जलपूजन प्रशासनामार्फत झाले नसल्याचे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच धरण क्षेत्रात ते परस्पर गेले कसे ? याचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून माजी महापौरांनी वाहत्या धरणात प्रसिद्धीचा हात धुवून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अपघात टाळण्यासाठी धरणाच्या दरवाजा क्षेत्रात प्रशासनाच्या परवानगी शिवाय इतरांना जाण्यास मनाई आहे. यानंतरही प्रशासनाला कानोकानी खबर न होता राजकीय मंडळींनी त्याठिकाणी प्रवेश करून पूजा उरकल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील तीन वर्षांपासून निवडणूक झालेली नसल्याने राजकारण्यांची चलबिचलता वाढली आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या पूजेची संधी न मिळाल्याने त्यांनी रविवारी डाव साधल्याची देखील चर्चा होत आहे. तर राजकीय व्यक्तींना धरण क्षेत्रात प्रवेश दिल्याप्रकरणी व तिथे पूजेचा घाट घातल्याप्रकरणी कोणावर कारवाई होईल का ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई