शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

नाटकातील प्रत्येक शब्द लोकांमध्ये पोहोचावा

By admin | Updated: January 11, 2017 06:26 IST

नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर

पनवेल : नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी येथे केले. अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई व कोकण विभागस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारीआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावरकर यांचा या समारंभात समस्त पनवेलकरांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘जो तो माझ्या वयाबद्दल बोलतो. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीवर काम करण्याची उमेद आहे,’ असे भावोद्गार सावरकर यांनी काढले. समारंभास लेखक व समीक्षक प्रा. नितीन आरेकर, दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, अभिनेते भरत सावले, जयवंत वाडकर, समीर खांडेकर, नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, गझलकार ए. के. शेख, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, नगरपरिषदेचे माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. नितीन आरेकर म्हणाले, ‘नाटकाचे अस्तित्व आपल्या सर्वांच्या शरीरात आहे. हा धागा व्रताप्रमाणे सांभाळून मनातील नाटक अटल असू द्या. दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी, कलाकारांनी इतर कलाकृती पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे सांगितले. (वार्ताहर)