शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

प्रत्येक भारतीय नागरिकाला हवी संविधानाची माहिती

By admin | Updated: November 30, 2015 02:28 IST

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विविधतेतही एकता जपणारा ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान आणि या देशाचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला या संविधानाची माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. संविधानाचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी याविषयी उपस्थितांशी डॉ. जाधव यांनी संवाद साधला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंभिरा सामाजिक संस्थेच्या सहयोगाने संविधान दिनानिमित्त २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मीळ छायाचित्रांच्या तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहाराची छायाचित्रे आणि त्यांनी वापरलेल्या साहित्याची छायाचित्रे याच्या प्रदर्शनाला तीन दिवसांत हजारो नागरिकांनी भेट दिली असून, डॉ. नरेंद्र जाधव यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन या अभिनव उपक्र माचे कौतुक केले. डॉ. नरेंद्र जाधव यांचे बोधप्रद विचार ऐकण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांनी म्हटल्याप्रमाणे दर्दींची उदंड गर्दी होती. आपले संविधान, आपला आत्मसन्मान ही भूमिका विशद करताना नागरिकांना संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांबरोबरच आपल्या सम्यक कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे. याकरिता दहावीपर्यंत अभ्यासक्र मात नागरिकशास्त्र हा विषय अनिवार्य करण्यात यावा आणि त्यामध्ये ५० टक्के भाग संविधानावर आधारित असावा, असे मत मांडत नरेंद्र जाधव यांनी संविधानाचे महत्त्व जनमानसात प्रसारित होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने हा विशेष कार्यक्र म आयोजित करून घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले.सुजाण नागरिक म्हणवून घेण्यासाठी भारतीय संविधानाची किमान माहिती प्रत्येकाला असायला हवी, असे सांगत उद्देशिका अर्थात सरनामा हा भारतीय संविधानाचा आत्मा असून, कमीत कमी शब्दांत प्रभावी आशय मांडणारी उद्देशिका सर्वोत्तम प्रभावी रचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार आदी उपस्थित होते.