शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:43 IST

ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत.

नवीन पनवेल : पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार, १३ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले.ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, रायगड येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक पनवेलमध्ये ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने पर्यटकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. परिणामी, पर्यटक चुकीचा रस्ता निवडतात आणि पोलिसांना चकवा देऊन ट्रेकिंगसाठी निघून जातात. अशाच प्रकारे १३ सप्टेंबर रोजी मालाड, मुंबई येथील ओमकार शेट्टी, जयेश मेहता, पुनीत बेहलानी हे तिघेजण पेबगडला ट्रेकिंगसाठी निघाले. पनवेल तालुक्यातील धोदानी-मालडुंगे येथून येथे त्यांनी आपली कार पार्क केली आणि ते पायी चालत ट्रेकिंगसाठी निघाले. पेबगडच्या दिशेने जात असताना ते रस्ता भरकटले. यावेळी त्यांनी नेरे येथील रूपेश पाटील यांना फोन केला व ते रस्ता चुकले असल्याचे त्यांनी त्याला सांगितले.यावेळी हे तिघेही रस्ता चुकल्याने पाय घसरून पडले होते व त्यांना थोड्या-फार जखमा झाल्या होत्या. त्यानंतर, पाटील यांनी याची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्या तीन तरुणांनी धबधब्याजवळ उभे असल्याचे सांगितले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी त्या ठिकाणी पोलीस पाठविले.तरु णाची मदतठिकाणांची माहिती नसल्याने पोलिसांनी संतोष नामक एका आदिवासी मुलाला सोबत घेत सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी या तिघांनाही सुखरूप खाली आणले, त्यांना मालाड येथे जाण्यास परवानगी दिली.

टॅग्स :panvelपनवेल