शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ईएसआयसी कामगार वसाहत मोडकळीस

By admin | Updated: June 20, 2017 06:02 IST

पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे.

सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची पर्यायी सोय केली जात नसल्यामुळे, ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पालिकेने गतवर्षी त्या ठिकाणच्या चार व यंदा नऊ इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण वसाहतच राहण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, यानंतरही कामगारांची राहण्याची पर्यायी सोय न करता, ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कामगारांच्या जीवावर टांगती तलवार निर्माण केली आहे.शासनाच्या वाशीतील कामगार रुग्णालयाचे कामगार मागील अनेक वर्षांपासून रोज मृत्यूशी सामना करत आहेत. इमारत मोडकळीस आलेली असतानाही, त्यांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. काही कामगार निवृत्तीच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यांच्याकडून आलेला दिवस कसाबसा काढण्याचे काम सुरू आहे. मागणी करूनही रुग्णालय प्रशासन कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवत नसल्याचीही खंत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनच कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. गतवर्षी महापालिकेने त्या ठिकाणच्या चार इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. या वेळी तीन इमारतींमधील कामगारांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच यंदा महापालिकेने त्या ठिकाणच्या उर्वरित नऊ इमारतीही धोकादायक घोषित केल्या आहेत. सर्वच इमारतींची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नसल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात इमारतींची डागडुजी झाली नसली, तरी प्रतिवर्षी डागडुजीचा खर्च मात्र मंजूर होत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे बळी कामगार ठरू नयेत, याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.मोडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी केल्यानंतर त्या इमारतींचा रहिवासी वापर होऊ शकतो. यामुळे अनेकदा कामगारांनी इमारतींसह संपूर्ण घरांच्या डागडुजीची मागणी केली आहे; परंतु निधीअभावी इमारतींच्या डागडुजीला टाळाटाळ करणारे वरिष्ठ अधिकारी, मर्जीतल्या कामगारांच्या घरांवर मात्र लाखोंचा खर्च करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. मोडकळीस आल्याने खंडर झालेल्या इमारतींभोवती झाडी वाढली असून, त्यामध्ये विषारी प्राण्यांचे वास्तव्य होऊ लागले आहे. मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी साप आढळून आले असल्याने लहान मुलांचे घराबाहेर खेळणेही धोकादायक झाले आहे.