शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षण

By admin | Updated: May 4, 2017 06:10 IST

समाजातील गरजू महिलांमध्ये शिवण कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करीत

अलिबाग : समाजातील गरजू महिलांमध्ये शिवण कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करीत असतानाच, पर्यावरणास घातक प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता या महिलांकडूनच कापडी पिशव्या शिवून घेऊन,पर्यावरणप्रेमींच्या सहयोगातून या कापडी पिशव्यांचे वितरण संपूर्ण जिल्ह्यात करण्याचा अनोखा उपक्रम आहे, तर महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण हेतू साध्य करण्याचा आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन येथील पर्यावरणप्रेमी भारत तन्ना यांनी केले आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी संलग्न येथील जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या ‘कापडी पिशव्या वाटप व स्वच्छ भारत अभियान उपक्रम’ या आगळ््या उपक्रमाचा शुभारंभ भारत तन्ना यांच्या हस्ते बुधवारी तन्ना कन्सल्टन्सी कार्यालयात करण्यात आला, त्यावेळी तन्ना बोलत होते.जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षण घेतलेल्या गरजू महिलांनी तयार केलेल्या १५ हजार कापडी पिशव्यांपैकी पहिल्या एक हजार पिशव्या विकत घेवून त्यांचे वाटप करून पर्यावरणविषयक जनजागृती करण्याचा तन्ना यांचा संकल्प आदर्शवत आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात पर्यावरणप्रेमींनी संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने पर्यावरणविषयक जनजागृती होवून समाजातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभेराहून स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेस मोठा हातभार लागू शकेल, असा विश्वास जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केला.समाजातील गरीब महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी, तसेच रोजगाराबरोबरच लोकांमध्ये प्लॅस्टिक बंदीचा विचार रुजवण्यात येवून कापडी पिशव्यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात यावे व प्रदूषणाच्या समस्येला आळा घालता यावा अशा बहुआयामी उद्देशातून जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून १००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याची माहिती यावेळी संस्थेचे संचालक विजय कोकणे यांनी यावेळी दिली.या कौशल्य विकासातील संस्थेच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संस्थेस दिल्ली येथे साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. यावेळी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव आदी उपस्थित होते.