शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षण

By admin | Updated: May 4, 2017 06:10 IST

समाजातील गरजू महिलांमध्ये शिवण कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करीत

अलिबाग : समाजातील गरजू महिलांमध्ये शिवण कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करीत असतानाच, पर्यावरणास घातक प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता या महिलांकडूनच कापडी पिशव्या शिवून घेऊन,पर्यावरणप्रेमींच्या सहयोगातून या कापडी पिशव्यांचे वितरण संपूर्ण जिल्ह्यात करण्याचा अनोखा उपक्रम आहे, तर महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण हेतू साध्य करण्याचा आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन येथील पर्यावरणप्रेमी भारत तन्ना यांनी केले आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी संलग्न येथील जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या ‘कापडी पिशव्या वाटप व स्वच्छ भारत अभियान उपक्रम’ या आगळ््या उपक्रमाचा शुभारंभ भारत तन्ना यांच्या हस्ते बुधवारी तन्ना कन्सल्टन्सी कार्यालयात करण्यात आला, त्यावेळी तन्ना बोलत होते.जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षण घेतलेल्या गरजू महिलांनी तयार केलेल्या १५ हजार कापडी पिशव्यांपैकी पहिल्या एक हजार पिशव्या विकत घेवून त्यांचे वाटप करून पर्यावरणविषयक जनजागृती करण्याचा तन्ना यांचा संकल्प आदर्शवत आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात पर्यावरणप्रेमींनी संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने पर्यावरणविषयक जनजागृती होवून समाजातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभेराहून स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेस मोठा हातभार लागू शकेल, असा विश्वास जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केला.समाजातील गरीब महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी, तसेच रोजगाराबरोबरच लोकांमध्ये प्लॅस्टिक बंदीचा विचार रुजवण्यात येवून कापडी पिशव्यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात यावे व प्रदूषणाच्या समस्येला आळा घालता यावा अशा बहुआयामी उद्देशातून जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून १००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याची माहिती यावेळी संस्थेचे संचालक विजय कोकणे यांनी यावेळी दिली.या कौशल्य विकासातील संस्थेच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संस्थेस दिल्ली येथे साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. यावेळी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव आदी उपस्थित होते.