शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 02:49 IST

ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रुपये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.

नवी मुंबई : स्वच्छ शहराप्रमाणेच प्रदूषणमुक्त शहर ही नवी मुंबई शहराची ओळख निर्माण व्हावी यासाठी जनसायकल सहभाग प्रणाली ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पर्यावरणपूरक ई-बाइक प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक हा उपक्र म संपूर्ण राज्यात राबविणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका असून गुरुवारी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.नवी मुंबई शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी कमी अंतरावर जाण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता नागरिकांनी इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनसायकल प्रणालीनंतर ई-बाइक प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. इको सिटी असणारी नवी मुंबई आता पर्यावरणशील सायकल सिटी व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून जन सायकल सहभाग प्रणाली व इलेक्ट्रीकल बाइक सुविधा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असून बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे विभागातील १४0 हून अधिक सायकल स्टेशन्समध्ये वाढ करीत आता कोपरखैरणे विभागात १0 व ऐरोली विभागात २0 अशी नवीन सायकल स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रु पये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.या प्रणालीचा वापर अत्यंत सोपा असून याकरिता नागरिकांनी आपल्या स्मार्टफोनवर युलू हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून नागरिक युलू सायकल अथवा युलू ई-बाइकवर असलेला कोड स्कॅन करून सायकल व ई-बाइक वापरास उपलब्ध करून घेऊ शकतात. सायकल व ई-बाइक घेण्याकरिता आणि ठेवण्याकरिता सायकल स्टेशन ठरविण्यात आलेली आहेत. या योजनेचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी मान्यवर नगरसेवक महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायकलिंगमुळे शहरातील प्रदूषणाला आळा बसेल व आरोग्यही चांगले राहील याची जाणीव शहरातील नागरिकांना असल्यामुळे सायकल सहभाग प्रणालीचा ८ महिन्यात ७२ हजार इतका मोठ्या प्रमाणात वापर झाला असून त्यामध्ये ४0 टक्के महिलांनी ही प्रणाली वापरली आहे. आतापर्यंत १0 लाख किलोमीटर इतके अंतर नागरिकांनी सायकल चालविली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये ही योजना नागरिकांमुळे यशस्वी झाली आहे.-डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तसायकलसारख्या प्रदूषण विरहित वाहनाला प्रोत्साहन देण्याची जनसायकल सहभाग प्रणालीची संकल्पना आठ महिन्यात नागरिकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरली असून सायकलिंग नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायी आहे. नागरिकांनी कमी अंतरावर ये-जा करण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा.-जयवंत सुतार,महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई