शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 02:49 IST

ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रुपये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.

नवी मुंबई : स्वच्छ शहराप्रमाणेच प्रदूषणमुक्त शहर ही नवी मुंबई शहराची ओळख निर्माण व्हावी यासाठी जनसायकल सहभाग प्रणाली ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पर्यावरणपूरक ई-बाइक प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक हा उपक्र म संपूर्ण राज्यात राबविणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका असून गुरुवारी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.नवी मुंबई शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी कमी अंतरावर जाण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता नागरिकांनी इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनसायकल प्रणालीनंतर ई-बाइक प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. इको सिटी असणारी नवी मुंबई आता पर्यावरणशील सायकल सिटी व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून जन सायकल सहभाग प्रणाली व इलेक्ट्रीकल बाइक सुविधा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असून बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे विभागातील १४0 हून अधिक सायकल स्टेशन्समध्ये वाढ करीत आता कोपरखैरणे विभागात १0 व ऐरोली विभागात २0 अशी नवीन सायकल स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रु पये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.या प्रणालीचा वापर अत्यंत सोपा असून याकरिता नागरिकांनी आपल्या स्मार्टफोनवर युलू हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून नागरिक युलू सायकल अथवा युलू ई-बाइकवर असलेला कोड स्कॅन करून सायकल व ई-बाइक वापरास उपलब्ध करून घेऊ शकतात. सायकल व ई-बाइक घेण्याकरिता आणि ठेवण्याकरिता सायकल स्टेशन ठरविण्यात आलेली आहेत. या योजनेचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी मान्यवर नगरसेवक महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायकलिंगमुळे शहरातील प्रदूषणाला आळा बसेल व आरोग्यही चांगले राहील याची जाणीव शहरातील नागरिकांना असल्यामुळे सायकल सहभाग प्रणालीचा ८ महिन्यात ७२ हजार इतका मोठ्या प्रमाणात वापर झाला असून त्यामध्ये ४0 टक्के महिलांनी ही प्रणाली वापरली आहे. आतापर्यंत १0 लाख किलोमीटर इतके अंतर नागरिकांनी सायकल चालविली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये ही योजना नागरिकांमुळे यशस्वी झाली आहे.-डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तसायकलसारख्या प्रदूषण विरहित वाहनाला प्रोत्साहन देण्याची जनसायकल सहभाग प्रणालीची संकल्पना आठ महिन्यात नागरिकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरली असून सायकलिंग नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायी आहे. नागरिकांनी कमी अंतरावर ये-जा करण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा.-जयवंत सुतार,महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई