शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 02:49 IST

ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रुपये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.

नवी मुंबई : स्वच्छ शहराप्रमाणेच प्रदूषणमुक्त शहर ही नवी मुंबई शहराची ओळख निर्माण व्हावी यासाठी जनसायकल सहभाग प्रणाली ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पर्यावरणपूरक ई-बाइक प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक हा उपक्र म संपूर्ण राज्यात राबविणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका असून गुरुवारी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.नवी मुंबई शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी कमी अंतरावर जाण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता नागरिकांनी इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनसायकल प्रणालीनंतर ई-बाइक प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. इको सिटी असणारी नवी मुंबई आता पर्यावरणशील सायकल सिटी व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून जन सायकल सहभाग प्रणाली व इलेक्ट्रीकल बाइक सुविधा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असून बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे विभागातील १४0 हून अधिक सायकल स्टेशन्समध्ये वाढ करीत आता कोपरखैरणे विभागात १0 व ऐरोली विभागात २0 अशी नवीन सायकल स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रु पये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.या प्रणालीचा वापर अत्यंत सोपा असून याकरिता नागरिकांनी आपल्या स्मार्टफोनवर युलू हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून नागरिक युलू सायकल अथवा युलू ई-बाइकवर असलेला कोड स्कॅन करून सायकल व ई-बाइक वापरास उपलब्ध करून घेऊ शकतात. सायकल व ई-बाइक घेण्याकरिता आणि ठेवण्याकरिता सायकल स्टेशन ठरविण्यात आलेली आहेत. या योजनेचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी मान्यवर नगरसेवक महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायकलिंगमुळे शहरातील प्रदूषणाला आळा बसेल व आरोग्यही चांगले राहील याची जाणीव शहरातील नागरिकांना असल्यामुळे सायकल सहभाग प्रणालीचा ८ महिन्यात ७२ हजार इतका मोठ्या प्रमाणात वापर झाला असून त्यामध्ये ४0 टक्के महिलांनी ही प्रणाली वापरली आहे. आतापर्यंत १0 लाख किलोमीटर इतके अंतर नागरिकांनी सायकल चालविली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये ही योजना नागरिकांमुळे यशस्वी झाली आहे.-डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तसायकलसारख्या प्रदूषण विरहित वाहनाला प्रोत्साहन देण्याची जनसायकल सहभाग प्रणालीची संकल्पना आठ महिन्यात नागरिकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरली असून सायकलिंग नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायी आहे. नागरिकांनी कमी अंतरावर ये-जा करण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा.-जयवंत सुतार,महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई