शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

पोलीस ठाण्याच्या भूखंडावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:20 IST

सानपाडा येथील प्रकार : परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

नवी मुंबई : सानपाडा पोलीसठाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या भूखंडावरील भंगार वाहनांचे अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सानपाडा सेक्टर १४ येथे पोलीसठाण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. सध्या ज्या ठिकाणी सानपाडा पोलिसांचा कारभार चालत आहे, ती जागा अपुरी शिवाय तात्पूर्त्या स्वरूपाची आहे. यामुळे त्या ठिकाणी पोलिसांसह तक्रारीच्या निमित्ताने येणाऱ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सानपाडा पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र जागा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला होता.त्यानुसार सानपाडा सेक्टर १४ येथील १ क्रमांकाचा भूखंड पोलीस ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे; परंतु विविध कारणांमुळे अद्याप त्या ठिकाणी पोलीसठाण्याची इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून मोकळा पडल्याची संधी साधून त्यावर भंगारातील वाहने साठवण्यात आली आहेत. अशातच पावसामुळे सदर भूखंडावर झुडपे वाढली आहेत. तर भंगारातील वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होत आहे. शिवाय, परिसरातील भटकी कुत्रीही त्याच ठिकाणी दबा धरून बसत असून, संधी साधून पादचाऱ्यांवर हल्ला करत आहेत.पालिकेने स्वच्छता अभियान राबवताना विविध ठिकाणी रस्त्यावर नादुरुस्त स्थितीमध्ये उभी असलेली ही वाहने उचलून त्या ठिकाणी जमा केली आहेत, त्यामुळे एकीकडे शहर स्वच्छता अभियान राबवताना, दुसरीकडे ठरावीक नोडचे विद्रूपीकरण केले जात असल्याचा संताप सानपाडातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, हा भूखंड पोलीसठाण्यासाठी असल्याने त्याचा वापर करण्यासाठी पोलिसांचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.परिणामी, ही वाहने त्या ठिकाणावरून हटवावीत यासाठी स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते.त्यानंतरही प्रशासन ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात उदासीनता दाखवत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस ठाण्यासाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर पालिकेनेच साठवलेल्या भंगारामुळे परिसराची शोभा जात आहे. शिवाय त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात यावी यासाठी यापूर्वी आंदोलनही करण्यात आलेले आहे. त्यानंतरही तिथले भंगार हटवले जात नसल्याने पालिकाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.- दशरथ भगत, माजी नगरसेवक