शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दूषित पाणी मोकळ्या भूखंडावर

By admin | Updated: November 2, 2015 02:13 IST

येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत

महाड : येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रदूषण करणाऱ्या एम्बायो कारखान्यावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी दिली.एम्बायो या कारखान्याकडून होणाऱ्या या प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. या कारखान्याच्या शेजारीच जीते आणि खैरे शैलटोली या गावच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर कारखान्यात प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सर्रासपणे सोडले जाते. घातक रसायनमिश्रित पाणी या विस्तीर्ण भूखंडावर पसरून अनेक ठिकाणी साचले आहे, हे पाणी सावित्री नदीला मिळणाऱ्या नाल्यात वाहून जात आहे. यामुळे जीते गावचे कब्रस्थान व भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कारखान्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्र असले तरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी एम्बायो कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित पाणी बाहेर सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी तसेच ते पसरलेल्या टेमघर नाल्यापर्यंतच्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी कारखान्यावर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.गेल्या वर्षभरापासून महाड औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी केंद्राकडून प्रत्येक कारखान्यातील सांडपाण्याचे टप्प्याटप्प्याने नमुने घेतले जात आहेत. यामुळे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना लगाम बसला आहे. सामायिक सांडपाणी केंद्र तसेच प्रदूषण मंडळाच्या संयुक्तिक कार्यवाहीमुळे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण रोखण्यात यश आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र एम्बायोसारखे कारखाने या यंत्रणांनाही चकवा देत प्रक्रिया न करताच सांडपाणी कारखान्याबाहेर सोडत आहेत. रसायनमिश्रित सांडपाणी भल्यामोठ्या साठवण टाकीत साठवून ते पाइपलाइनद्वारे शेजारील भूखंडावर सोडण्यात येत आहे. (वार्ताहर)