शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

दूषित पाणी मोकळ्या भूखंडावर

By admin | Updated: November 2, 2015 02:13 IST

येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत

महाड : येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रदूषण करणाऱ्या एम्बायो कारखान्यावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी दिली.एम्बायो या कारखान्याकडून होणाऱ्या या प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. या कारखान्याच्या शेजारीच जीते आणि खैरे शैलटोली या गावच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर कारखान्यात प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सर्रासपणे सोडले जाते. घातक रसायनमिश्रित पाणी या विस्तीर्ण भूखंडावर पसरून अनेक ठिकाणी साचले आहे, हे पाणी सावित्री नदीला मिळणाऱ्या नाल्यात वाहून जात आहे. यामुळे जीते गावचे कब्रस्थान व भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कारखान्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्र असले तरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी एम्बायो कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित पाणी बाहेर सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी तसेच ते पसरलेल्या टेमघर नाल्यापर्यंतच्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी कारखान्यावर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.गेल्या वर्षभरापासून महाड औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी केंद्राकडून प्रत्येक कारखान्यातील सांडपाण्याचे टप्प्याटप्प्याने नमुने घेतले जात आहेत. यामुळे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना लगाम बसला आहे. सामायिक सांडपाणी केंद्र तसेच प्रदूषण मंडळाच्या संयुक्तिक कार्यवाहीमुळे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण रोखण्यात यश आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र एम्बायोसारखे कारखाने या यंत्रणांनाही चकवा देत प्रक्रिया न करताच सांडपाणी कारखान्याबाहेर सोडत आहेत. रसायनमिश्रित सांडपाणी भल्यामोठ्या साठवण टाकीत साठवून ते पाइपलाइनद्वारे शेजारील भूखंडावर सोडण्यात येत आहे. (वार्ताहर)