शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रोजगार मेळाव्यात ८७५० उमेदवारांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:36 IST

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली.

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली. १७५ कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दिवसभरामध्ये ३३०६ जणांच्या मुलाखती होऊन १६०२ जणांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे रोजगार मेळावे घेतले जाणार असल्याचे यावेळी उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.वाशी रेल्वे स्टेशनसमोरील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रात ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सीआयआय या उद्योग संघटनांचा या उपक्र मात सहभाग होता. सुभाष देसाई यांनी प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारचे मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून यापूर्वी एअर इंडिया, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नाव या रोजगार मेळाव्याला दिले आहे. राज्यात गुंतवणूक वाढत असून रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व कल्याण परिसरामध्येही अशाप्रकारचे मेळावे आयोजित करावे अशी सूचना केली. रोजगार मेळाव्यामुळे एकाच छत्राखाली विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्यामुळे या मेळाव्यांची गरज असल्याचे स्पष्ट केले. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही रोजगार इच्छुकांनीही संकुचित वृत्ती सोडून आणि केवळ तात्कालिक विचार न करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले आहे.