शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

By admin | Updated: March 28, 2017 06:24 IST

सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी मुंबई : सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एजन्सीचालकांनी भविष्यनिर्वाह निधी व्यवस्थापनाकडे तशी कबुली दिली असून, पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे; पण वास्तविक हा कष्टकरी कामगारांच्या पैशाचा अपहार असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अथर्व एजन्सीच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. सिडकोचे कार्यक्षेत्र वाढू लागल्याने व त्याप्रमाणात कर्मचारी नसल्याने जवळपास २०१० पासून बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती केली जात आहे. खारघरमध्ये अथर्व एजन्सीला निविदा न काढताच हा ठेका दिला होता; पण याविषयी अनेकांनी आवाज उठविल्यानंतर निविदा काढून पुन्हा त्याच एजन्सीला काम देण्यात आले. निविदा काढण्यापूर्वी दोन ते तीन वर्षे व निविदा काढल्यानंतर तीन वर्षे अथर्वच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत भरणे, ही ठेकेदाराची जबाबदारी होती; पण प्रत्यक्षात ही रक्कम कधीच भरण्यात आली नाही. सानपाडामधील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी याविषयी तक्रार केल्यानंतर सिडकोने त्या एजन्सीला मुदतवाढ दिली नाही. त्यांच्याऐवजी दुसरी एजन्सी नेमली आहे; पण पहिल्या एजन्सीने कामगारांचे थकविलेले पैसे न देता, त्याचा अपहार केल्याविषयी मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. एजन्सीला दिलेली रक्कम व त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे का? भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नसताना त्यांना बिले कशी अदा करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ठेकेदाराने किती कामगारांचे पैसे भविष्यनिर्वाह निधीमध्ये भरले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी सुरेश मढवी यांनी माहिती अधिकाराचा वापर केला होता. यामधून कोणाचेही पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. मढवी यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कार्यालयाने सिडकोला पत्र पाठवून माहिती मागविली होती. यानंतर अथर्वच्या चालकांनी २४ फेब्रुवारीला शपथपत्र दाखल केले आहे. २४९ कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. अभय योजनेअंतर्गत त्यांनी हा अर्ज केला आहे; पण वास्तविक कर्मचाऱ्यांचा हा आकडा बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय तीन वर्षांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची तयारी दर्शविली; पण काही कर्मचारी २०१० पासून कार्यरत होते. त्यांच्या पैशांचे काय? असेही मढवी यांनी विचारले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अथर्वच्या कामाची सखोल चौकशी केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजेतच, त्याबरोबर ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. - सुरेश मढवी, सामाजिक कार्यकर्ते