शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

By admin | Updated: March 28, 2017 06:24 IST

सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी मुंबई : सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एजन्सीचालकांनी भविष्यनिर्वाह निधी व्यवस्थापनाकडे तशी कबुली दिली असून, पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे; पण वास्तविक हा कष्टकरी कामगारांच्या पैशाचा अपहार असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अथर्व एजन्सीच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. सिडकोचे कार्यक्षेत्र वाढू लागल्याने व त्याप्रमाणात कर्मचारी नसल्याने जवळपास २०१० पासून बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती केली जात आहे. खारघरमध्ये अथर्व एजन्सीला निविदा न काढताच हा ठेका दिला होता; पण याविषयी अनेकांनी आवाज उठविल्यानंतर निविदा काढून पुन्हा त्याच एजन्सीला काम देण्यात आले. निविदा काढण्यापूर्वी दोन ते तीन वर्षे व निविदा काढल्यानंतर तीन वर्षे अथर्वच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत भरणे, ही ठेकेदाराची जबाबदारी होती; पण प्रत्यक्षात ही रक्कम कधीच भरण्यात आली नाही. सानपाडामधील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी याविषयी तक्रार केल्यानंतर सिडकोने त्या एजन्सीला मुदतवाढ दिली नाही. त्यांच्याऐवजी दुसरी एजन्सी नेमली आहे; पण पहिल्या एजन्सीने कामगारांचे थकविलेले पैसे न देता, त्याचा अपहार केल्याविषयी मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. एजन्सीला दिलेली रक्कम व त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे का? भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नसताना त्यांना बिले कशी अदा करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ठेकेदाराने किती कामगारांचे पैसे भविष्यनिर्वाह निधीमध्ये भरले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी सुरेश मढवी यांनी माहिती अधिकाराचा वापर केला होता. यामधून कोणाचेही पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. मढवी यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कार्यालयाने सिडकोला पत्र पाठवून माहिती मागविली होती. यानंतर अथर्वच्या चालकांनी २४ फेब्रुवारीला शपथपत्र दाखल केले आहे. २४९ कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. अभय योजनेअंतर्गत त्यांनी हा अर्ज केला आहे; पण वास्तविक कर्मचाऱ्यांचा हा आकडा बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय तीन वर्षांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची तयारी दर्शविली; पण काही कर्मचारी २०१० पासून कार्यरत होते. त्यांच्या पैशांचे काय? असेही मढवी यांनी विचारले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अथर्वच्या कामाची सखोल चौकशी केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजेतच, त्याबरोबर ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. - सुरेश मढवी, सामाजिक कार्यकर्ते